AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे पवार आता कुठे आहेत? राजू शेट्टींचा सवाल, तर आजच्या निकालाबाबत म्हणतात…

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ? राज्य सरकारने दोन कायदे केलेत त्याला आमचा विरोध आहे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे आणि शरद पवारांना भेटून मी जाब विचारणार असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे पवार आता कुठे आहेत? राजू शेट्टींचा सवाल, तर आजच्या निकालाबाबत म्हणतात...
राजू शेट्टी
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 3:27 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सतत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी मैदानात असणारे राजू शेट्टी (Raju Shetty) केंद्र सरकारवरही तोफा डागत असतात. आता तर राजू शेट्टींनी थेट शरद पवारांवर (Sharad pawar) घणाघाती टीका केली आहे. शरद पवार पावसात भिजले त्यानंतर ढेकळं विरघळावी तसे विरघळून जाऊन शेतकऱ्यांनी मतं दिली, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेला घेऊन सरकार स्थानप झालं मात्र शेतकऱ्यांची काम झाली नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ? राज्य सरकारने दोन कायदे केलेत त्याला आमचा विरोध आहे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे आणि शरद पवारांना भेटून मी जाब विचारणार असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीने हुरळून जायचे कारण नाही

स्थानिक स्वराज्य संस्थेत राज्यात ज्यांचं सरकार असतं त्यांचे लोक विजयी होतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे म्हणून हे लोक त्यांच्याकडे गेलेत, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. यावरुन राज्याचं सार्वमत सांगता येणार नाही, महाविकास आघाडीने त्यांचा कारभार सुधारला नाही तर त्यांना धोक्याची घंटा निश्चित आहे, असे सूचक विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.

रोहित पाटलांच्या विजयाबाबत काय म्हणाले?

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी भाजपसह इतर राजकीय पक्षांना धोबीपछाड देत मोठा विजय प्राप्त केला आहे, यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, रोहितचे अभिनंदन, सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी पण रोहितचा आदर्श घ्यावा, प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद , क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटलांच्या विजयावर त्यांनी दिली आहे.

Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती

Nagar Panchayat Election result 2022: शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटील यांचं अभिनंदन

Goa Assembly Elections 2022 : अमित पालेकर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, गोव्यात आपचं भंडारी कार्ड चालणार?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.