AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलावली अतितातडीची बैठक, बराच वेळ खलबतं, अखेर काय ठरलं?

शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, अशी शिवाजी आढळराव पाटील यांची इच्छा आहे. पण शिरुर लोकसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा या मतदारसंघावर दावा आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलावली अतितातडीची बैठक, बराच वेळ खलबतं, अखेर काय ठरलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 29, 2024 | 7:50 PM
Share

सुनील थिगळे, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 29 फेब्रुवारी 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली. शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, अशी शिवाजी आढळराव पाटील यांची इच्छा आहे. पण शिरुर लोकसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा या मतदारसंघावर दावा आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढण्याची शक्यता असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या. पण शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार आहेत. यासाठी त्यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

“शिरूर लोकसभा मतदारसंघ गेल्या आठवडाभर चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार इथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो. ते म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले”, अशी प्रतिक्रिया शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली.

‘कार्यकर्तेही म्हणत आहेत की, राष्ट्रवादीला जागा सुटली तर…’

“कदाचित त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्तेही म्हणत आहेत की, राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे”, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

“परिस्थितीनुसार निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचे सूर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार निवडून जाणे महत्वाचं आहे”, असं शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितलं. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आढळराव अजित पवार गटात आले तर आपण राजकारण सोडू असं ते म्हणाले आहेत. याबाबत शिवाजी आढळराव पाटील यांना प्रश्न विचारला असता “निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर नाराजांचे मनधरणी करावी लागते”, अशी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.