AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारिक रहमान पंतप्रधान होताच भारताचं बांगलादेशला मोठं गिफ्ट, घेतला सर्वात मोठा निर्णय

तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेताच आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत आहेत. भारतानं मोठी घोषणा केली असून, त्याचा मोठा फायदा बांगलादेशला होणार आहे.

तारिक रहमान पंतप्रधान होताच भारताचं बांगलादेशला मोठं गिफ्ट, घेतला सर्वात मोठा निर्णय
भारताची बांगलादेशला मोठी भेट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 7:31 PM
Share

बांगलादेशमध्ये नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीमध्ये बीएनपीला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला मोठं यश मिळालं. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच आता भारत आणि बांगलादेशमधील संबंध पुन्हा एकदा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. बांगलादेशमधील एका भारतीय उच्चपदस्थ राजदूताने म्हटलं आहे की, आता भारत लवकरच बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पूर्ववत करेल. यामुळे आता बांग्लादेश आणि भारतामधील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुसचं काळजीवाहू सरकार असताना दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती, दोन्ही देशांमध्ये तणाव पहायला मिळत होता. मात्र आता तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

बांगलादेशच्या एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार बांगलादेशमधील भारतीय उच्चपदस्थ राजदूत अनिरुद्ध दास यांनी म्हटलं आहे की, भारत लवकरच बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पूर्वत करेल, त्यासाठी आवश्यक पाऊलं उचलली जात आहेत. मेडीकल आणि डबल एन्ट्री व्हिसा आता जारी करण्यास सुरुवात झाली आहे.ट्रॅव्हल व्हिसा आणि दुसऱ्या इतर विभागातील व्हिसा देखील लवकरच पूर्ववत केले जातील. ते बांगलादेशच्या सिलहट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लबमध्ये बोलत होते.

भारताने 17 डिसेंबर 2025 मध्ये बांगलादेशची व्हिसा सर्व्हिस सस्पेंड केली होती. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, बांगलादेशमध्ये आता बीएपीची सत्ता आली आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे, त्यानंतर भारताकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं काळजीवाहू सरकार असताना भारत आणि बांगलादेशमधील संबंध प्रचंड ताणले गेले होते, बांगलादेशकडून वारंवार या काळात शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला जात होता. मात्र आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे, कारण नव्या सरकारकडून या आधीही हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवला जाईल, मात्र त्यामुळे भारत बांगलादेश संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Follow Us
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही.
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता...
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत.....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत......
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या.
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने.