AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ठिणगी पडली! राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरात; भाजप बंदमध्ये सहभागी असणार की नाही?

पिंपरी चिंचवडमध्ये विविध संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या बंदला भाजपचा पाठिंबा नसणार आहे.

अखेर ठिणगी पडली! राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद 'या' शहरात; भाजप बंदमध्ये सहभागी असणार की नाही?
राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद 'या' शहरात होणार; भाजपचा बंदमध्ये सहभागी होणार की नाही?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 04, 2022 | 10:46 AM
Share

पिंपरी चिंचवड: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच स्तरातून राज्यपाल हटावच्या मागणीने जोर धरलेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आझाद मैदानावर विराट मोर्चाची हाक दिली आहे. राज्यपाल हटवण्यासाठीच्या राजकीय हालचाली सुरू असतानाच पिंपरी चिंचवडमधील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. येत्या 8 तारखेला हा बंद पुकारण्यात येणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात सुरू असलेला विरोध अजून ही संपताना दिसत नाही. आता पिंपरी चिंचवडमधल्या सर्व संघटनांनी एकत्र येत येत्या 8 तारखेला पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विविध संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या बंदला भाजपचा पाठिंबा नसणार आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने सात दिवस राज्यात आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पहिलं आंदोलन मंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबाद येथील घरासमोर केलं. मराठा क्रांती मोर्चाने ढोल वाजवत राज्यपाल हटावचा नारा दिला. काळी टोपी हाय हाय, राज्यपाल हटवलेच पाहिजे, अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

यावेळी सावे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांचं निवेदन स्वीकारलं. तसेच तुमचं निवेदन पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था मी करतो, असं सावे म्हणाले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

Follow Us
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.