AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Shelke : तुमचं डिपॉझिटही जनता जप्त करते, लायकी असेल तर मावळात उभं राहा; सुनील शेळकेंचं गोपीचंद पडळकरांना आव्हान

महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्याचे आणि देशातील महागाई, बेरोजगारी ह्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाची रणनीती आहे, असा आरोप सुनील शेळके यांनी केला.

Sunil Shelke : तुमचं डिपॉझिटही जनता जप्त करते, लायकी असेल तर मावळात उभं राहा; सुनील शेळकेंचं गोपीचंद पडळकरांना आव्हान
सुनील शेळके/गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jun 06, 2022 | 4:29 PM
Share

मावळ, पुणे : भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) जी वक्तव्ये करीत आहेत, ती जाणीवपूर्वक करत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलेही वक्तव्य केले तरी जनता ते स्वीकारत होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी जे वक्तव्य केले होते ते लायकी नसलेल्या पडळकरांनी करणे शोभत नाही, अशी घणाघाती टीका मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केली आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये शरद पवार यांचे योगदान देशाला माहीत आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी आपली लायकी पाहून वक्तव्ये करायला हवीत, असे सुनील शेळके म्हणाले आहेत. गोपचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) गुरू मानले आहे. तेव्हा फडणवीसांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्या पिलावळांना समजून सांगितले पाहिजे, असे शेळके म्हणाले.

‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

आपल्याला विधानपरिषद दिली म्हणून उगाच कुणावर तोंड टाकायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या ग्रामपंचायतीमध्येसुद्धा आपल्याला किंमत नाही. विधानसभेत काय दिवे लावता, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तुमचे डिपॉझिटही जनता जप्त करते. जर तुमची लायकीच असेल तर एकदा मावळात येवून उभे राहा, मग तुम्हाला तुमची लायकी कळेल, असा घणाघात शेळके यांनी पडळकर यांच्यावर केला आहे.

‘लक्ष विचलित करण्याचे काम’

बेतालपणे बोलणाऱ्या पडळकरांना महत्त्व देऊ नये. त्यांच्या मागे असलेले ज्यांची तडफड सुरू आहे, अशा फडणवीसांना सांगा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. राजकीय दर्जा खालावत चालण्यामागचा सूत्रधार कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ही आपली संस्कृती आणि राजकारण नव्हते. महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्याचे आणि देशातील महागाई, बेरोजगारी ह्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाची रणनीती आहे, असा आरोप त्यांनी केला.

गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य काय?

गोपीचंद पडळकर यांनी कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली होती. नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या ###वर लाथ घाला, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील. त्यानंतर त्यांना कांद्याचा वास द्या, ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का, असा सवाल करून पडळकर यांनी वाद ओढवून घेतला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?