AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalicharan Maharaj: औरंगजेबाला जे हिरो मानतात, ते त्याच्या थडग्यावर माथा टेकवतात; हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे – कालीचरण महाराज

औरंगजेब त्यांचा हिरो आहे, औरंगजेबाने पाच लाख मंदिरे फोडली. हिंदूंवर नाना विविध अत्याचार केले. ते बरोबरच होते ज्याअर्थी मंदिरे फोडण बरोबर होतं हे दाखविण्यासाठी आताचे जे जिहादी लोक आहेत. ते थडग्यावर माथा टेकतात हे हिंदूंना समजलं पाहिजे असा टोला त्यांनी अकबरुउद्दीन ओवेसीचे नाव न घेता लगावला आहे.

Kalicharan Maharaj: औरंगजेबाला जे हिरो मानतात, ते त्याच्या थडग्यावर माथा टेकवतात; हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे - कालीचरण महाराज
कालीचरण महाराज (प्रातिनिधिक फोटो )Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 1:33 PM
Share

बारामती – औरंगजेबाला जे हिरो मानतात, ते त्याच्या थडग्यावर माथा टेकवतात. औरंगजेबाने(Aurangzeb) जे केलं तस करण्याचा विचार करत आहेत, हे हिंदूंना समजलं पाहिजे. हिंदूंनी सडका वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद जातीयवाद सोडून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे(Chhatrapati Shivaji Maharaj)  मराठ्यांचे साम्राज्य स्थापित करू इच्छित नव्हते ते हिंदवी स्वराज्य स्थापित करू इच्छित होते म्हणून हिंदूंच्या स्वराज्यासाठी छत्रपती ने जे प्रयत्न केले त्याला आपण पुढे नेले पाहिजे. . भारताला हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी वाटचाल केली पाहिजे. असे जहाल मत कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj)यांनी बारामती येथे बोलताना व्यक्त केलं आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की औरंगजेब त्यांचा हिरो आहे, औरंगजेबाने पाच लाख मंदिरे फोडली. हिंदूंवर नाना विविध अत्याचार केले. ते बरोबरच होते ज्याअर्थी मंदिरे फोडण बरोबर होतं हे दाखविण्यासाठी आताचे जे जिहादी लोक आहेत. ते थडग्यावर माथा टेकतात हे हिंदूंना समजलं पाहिजे असा टोला त्यांनी अकबरुउद्दीन ओवेसीचे नाव न घेता लगावला आहे.

राज ठाकरे यांना माझं जाहीर समर्थन

पूर्वीच्या भाषा वादामुळे मन दुखावलेली आहेत. हिंदू भाषावाद केल्यामुळे, वर्णवाद केल्यामुळे, प्रांतवाद केल्यामुळे निसंशय तुटतोय ते पूर्वीचे जी मन दुखावलेली आहेत. त्यामुळे ही स्थिती आहे. ती स्थिती लवकरच निवळेल. कायदा आणि साहित्यबरोबर आहे. त्याचे काही इतर लोक आहेत ते श्रीराम प्रभुंच्या चरणी दर्शन घेण्यासाठी येणार असतील तर त्यांचे स्वागतच करू असे म्हटले आहेत. परंतु राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलेला आहे, त्याचा उद्देश हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा आणि तो हातात घेत यामुळेच राज ठाकरे यांना माझं जाहीर समर्थन आहे.

खरी अभिव्यक्तीची स्वतंत्रता पायदळी तुडवली जाते

राष्ट्रद्रोह व राजद्रोह कशावरही लावून त्याला जामीन मिळून न देणे असे काही लोकांचे षड्यंत्र आहेत. इंग्रजांनी हा राष्ट्रद्रोहाचा कायदा बनवला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, त्यामुळे खरी अभिव्यक्तीची स्वतंत्रता पायदळी तुडवली जाते म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, राष्ट्रदोह आणि राजद्रोहाचा हा कायदाच राष्ट्रद्रोहाचा कायद्या सपुष्टात आणा. रवी राणा, नवनीत राणा यांना माझं जाहीर समर्थन आहे असे देखील कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.