AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट, प्रवाशांना काय काय सुविधा मिळणार

Pune News : रेल्वे मंत्रालयाने एकाच वेळी अनेक पातळीवर सुधारणा सुरु केल्या आहेत. रेल्वे वाढवल्या जात असताना रेल्वे स्थानके अद्यावत केली जात आहेत. त्यात पुणे, मुंबई रेल्वे स्थानकांचा समावेश केला आहे.

पुणे, मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट, प्रवाशांना काय काय सुविधा मिळणार
pune railway
| Updated on: Jul 24, 2023 | 2:35 PM
Share

योगेश बोरसे, पुणे | 24 जुलै 2023 : भारतीय रेल्वेत मोठ्या सुधारणा होत आहे. नवीन नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहे. वंदे भारतसारखी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु झाली आहे. बुलेट ट्रेन सुरु करण्याचे काम सुरु आहे. लोकलमध्ये बदल केला जात आहे. जुन्या लोकलची जागा वंदे लोकल घेणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांचाही विकास केला जात आहे. रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा निर्माण केल्या जात आहे. आता राज्यातील पुणे, मुंबईसह विविध रेल्वे स्थानकावर नवीन योजना सुरु होणार आहे. त्यामुळे ही स्थानके बदलणार आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश

राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. त्यामध्ये पुणे, मुंबईसह राज्यातील इतर काही रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश केला गेला आहे.

काय मिळणार सुविधा

रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच स्थानक परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रेल्वे स्थानकांचा प्रवेशद्वार अधिक चांगला केला जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षागृहे अधिक चांगली केली जाणार आहे. यासाठी नवीन आराखडा तयार होणार आहे. स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मोफत वाय-फाय किऑस्कची उभारणी केली जाणार आहे.

रेल्वे स्थानकापासून रेल्वेपर्यंत बदल

रेल्वेने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. रेल्वे अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला जात आहे. ओडिशाच्या बालासोरजवळ तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकून रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातानंतर या पद्धतीचे कोणतेही अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे येत्या काही काळात रेल्वे स्थानकांपासून रेल्वेपर्यंत अनेक बदल दिसणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.