AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. (Ujani Water Solapur Farmers Protest )

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ
जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
| Updated on: May 26, 2021 | 11:05 AM
Share

पंढरपूर/बारामती : उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे (Ujani Water Issue) सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. तर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेक वाढ करण्यात आली आहे. (Ujani Water Issue Solapur Farmers Protest burns Jayant Patil effigy Sharad Pawar baramati residence security tighten)

लेखी अध्यादेशाची मागणी

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाणी पळवून नेले आहे. तो निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, भाजप आणि इतर संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली होती. त्यानंतर जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगितले” असं प्रभाकर देशमुख म्हणाले.

जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

“त्या निर्णयाचा अध्यादेश लेखी घ्यावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी जनहित शेतकरी संघटनेकडून उजनी परिसरातील भीमनगर येथे बेमुदत उपोषण सुरु आहे. सोमवारी जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. राज्य सरकार त्वरीत तोंडी आश्वासने देतात, मात्र लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थळी अध्यादेश घ्यावा” अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

पवारांच्या बारामतीतील घराबाहेर सुरक्षेत वाढ

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. त्यानंतर अनेक आंदोलकांची सोलापूर जिल्ह्यात धरपकड करण्यात आली. दोघा आंदोलकांना बारामती तालुक्यात अटक झाली आहे. आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या:

उजनीच्या धरणातील पाण्याचा आदेश रद्द, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा निर्णय

उजनीच्या पाण्याचा वाद: इंदापूरमध्ये टायर जाळून रास्ता रोको तर पंढरपूरमध्ये आनंदोत्सव

(Ujani Water Issue Solapur Farmers Protest burns Jayant Patil effigy Sharad Pawar baramati residence security tighten)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.