AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह

पुण्यातील मुंढवा परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या वेटरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे या वेटरचे नाव आहे.

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 7:49 AM
Share

पुणे : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या वेटरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे या वेटरचे नाव आहे. त्याने हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हॉटेलमधील लोकांनी फसवल्याचा आरोप 

अरविंद सिंह याने हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून, आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांने फेसबूक लाईव्ह देखील केले होते. हॉटेलमधील काही लोकांनी आपल्याला फसवले असल्याचा आरोप त्याने आत्महत्येपूर्वी केला होता. आपली फसवणूक झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले. त्यानंतर अरविंद सिंह यांनी तेराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

एक महिन्यापूर्वीच लागला होता कामाला

अरविंद हा मूळचा उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे. एक महिन्यापूर्वीच तो पुण्यात कामाला लागला होता. तो हॉटलेच्या पेंट हाऊसमध्ये राहात होता. मात्र त्याने आचानक आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्याला हॉटेलमधील काही लोकांनी फसवल्याचा आरोप त्याने आत्महत्येपूर्वी केला होता. दरम्यान त्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या 

MAHA TET: महाटीईटी परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार, प्रवेशपत्रही जाहीर

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पुण्यात लोहगाव विमानतळावर1 डिसेंबरपासून ‘विंटर शेड्युल’ सुरु

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.