महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय, बीडच्या नगराध्यक्षांची जहरी टीका, एका वाक्यात किती जणांवर निशाणा?
महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय झाली आहे, अशी जहरी टीका बीडचे काका नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली आहे. पुतण्या गँग या एकचा शब्दात त्यांनी अनेकांवर टीका केली.
बीडः महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय झाली आहे, अशी जहरी टीका बीडचे काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Bharatbhushab Kshirsagar) यांनी केली आहे. पुतण्या गँग या एकचा शब्दात त्यांनी अनेकांवर टीका केली. बीडमधील काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यातील वाद जुना आहे. मात्र यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पुतण्या त्यांनी टीका आहे. परळीत, बारामतीत आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
‘संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले’
पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय झाली आहे. अशी जहरी टीका काका नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली आहे. शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केला असा सवाल उपस्थित करत राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात खोडा घालणारी नसावी. मी 88 कोटी आणले तर तुम्ही 100 कोटी आणा… असा थेट घणाघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केला आहे.
विकासकामावरून काका-पुतण्यात वाद
बीड नगरपालिकेतील विकास कामावरून क्षीरसागर काका पुतण्यात यापूर्वीही अनेकदा जुंपली आहे. शिवसेनेच्या ताब्यातील बीड नगरपालिकेतील विकास कामात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर खोडा घालत असल्याचा आरोप बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, ‘ तुम्ही आमदार व्हा म्हणून माझ्यात विष कालविण्याचे काम केले. 35 वर्ष झाले मी नगराध्यक्ष आहे. माझे वय 60 वर्ष झाले मात्र मी कधीही आमदार व्हायचं म्हणालो नाही. रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय झाली आहे.
इतर बातम्या-