AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतर राज्यांत 100 टक्के लसीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही?; भारती पवार यांचा सवाल

इतर राज्यांमध्ये जर 100 टक्के लसीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थित केला आहे.

इतर राज्यांत 100 टक्के लसीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही?; भारती पवार यांचा सवाल
BHARTI PAWAR
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jan 03, 2022 | 3:45 PM
Share

राज्यात आजपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात अचानक केसेस वाढत आहेत, अशा परिस्थितीत धडाडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. केंद्रीय पथकांनी आढावा घेऊन सूचना केल्या आहेत. इतर राज्यांमध्ये जर 100 टक्के लसीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थित केला आहे. केंद्राने सगळ्या राज्यांना लस उपलब्ध करून दिली आहे, राज्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा आकडा कमी आहे, तो वाढवण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ

सध्या मुंबईत प्रचंड रुग्णसंख्या वाढते आहे, आताच काळजी घेतली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. पुढचा धोका ओळखून केंद्राने महाराष्ट्रालाही निधी दिला आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप या निधीच्या माध्यमातून पुढे काम झालेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. निधी उपलब्ध असेल तर तो खर्च केला पाहिजे, त्यासाठी आमच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्राने ECCRP 1 आणि ECRP 2 च्या माध्यमातून 23 हजार कोटींची मदत दिली आहे, असा दावाही भारती पवार यांनी केला आहे.

रुग्ण वाढल्यास केंद्राचा प्लॅन काय?

येत्या काळात प्रत्येक राज्याला पेशंट वाढले तर काय करायचं? या संदर्भातील पत्रं केंद्राने दिले आहेत. ओमिक्रॉनचा प्रसार वाढल्याने राज्यांनी अलर्ट राहवे, काही राज्यात 100 टक्के लसीकरण झाले आहे, तिथे कमी केसेस आहेत, असेही भारती पवार म्हणाल्या आहेत. तसेच मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्या बद्दल त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.

भीषण बर्फवृष्टी काय असते? सौदी अरेबियातले हा Video पाहून कळेल, निव्वळ अविश्वसनीय!

पोलिसांना शिवीगाळ करणं भोवलं, भंडाऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक

NCP- Shivsena controversy| राष्ट्र्रवादी -शिवसेनेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर : ‘आमचं अस्तित्व राहू द्या, शिवसैनिकाला सुखाने जगू द्या’ म्हणत शिवाजी आढळराव पाटलांचा गंभीर आरोप

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल