AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar: … तर सचिन तेंडुलकर याने भारतरत्न परत करावा; बच्चू कडू यांची मागणी

MLA Bcchu Kadu on Sachin Tendulkar and Bharatratna : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने भारतरत्न परत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राजकीय मौनव्रत धारण केलंय. काय कारण? वाचा...

Sachin Tendulkar: ... तर सचिन तेंडुलकर याने भारतरत्न परत करावा; बच्चू कडू यांची मागणी
| Updated on: Aug 29, 2023 | 4:21 PM
Share

पनवेल | 29 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन गेम्स आणि त्यांच्या जाहीरातीवरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा, अशी मागणी त्यांनी केलीय. सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जी काही जाहिरात केली. ती अतिशय वाईट आहे. सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळे घरंच्या घरं बरबाद होत असतील, तर हे योग्य नाही. त्यासाठी आम्ही आंदोलन करू. जर सचिन तेंडुलकरला जाहिरात करायची असेल तर त्यांनी भारतरत्न परत करावा. एक तर जाहिरात करणं बंद करा. नाहीतर भारतरत्न पुरस्कार परत करावा. या दोन्हीपैकी एक केलं पाहिजे. ते जर त्यांनी केलं नाही तर आम्ही आंदोलन करू, असं आमदार बच्चू कडू म्हणालेत. तसंच आपण राजकीय मौनव्रत धारण करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. बच्चू कडू पनवेलमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दिव्यांग मॉल

देशातील पहिला दिव्यांग मॉल पनवेलमध्ये होणार आहे. दिव्यांगांना पाहिजे ती वस्तू खरेदी करता येईल असा मॉल हा असला पाहिजे. प्रत्येक दिव्यागांच्या जवळ जाऊन माहिती आढावा घेणार आहे. 15 ते 20 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. यातून एक धोरण तयार करत आहोत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही सर्व्हे करणार आहोत. चौदाशे कोटींचा निधी आहे. केंद्र आणि राज्याचा 5 टक्के निधी मिळत नाही. पण या निधीसाठी आग्रही मागणी धरत आहोत. महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे जिथे दिव्यांगांसाठी असं काम केलं जात आहे. इतर राज्यात कुठेही असं काम होत नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

राजकीय मौनव्रत

आजपासून 16 ऑक्टोबरपर्यंत काहीही राजकीय बोलणार नाही. मी फक्त कांद्याच्या प्रश्नावर बोलणार आहे. इतर गोष्टींवर बोलणार नाही. 16 ऑक्टोबरपर्यंत मी राजकीय मौन पाळलं असून फक्त कांदा प्रश्नांवर बोलणार आहे. त्याच विषयी मी मुद्दे मांडणार आहे. कारण शेतकऱ्यांचे मुद्दे महत्वाचे आहेत, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

हमीभाव हा खूप कमी आहे. वाढलेले भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतो तर कमी भाव वाढण्यासाठी कुठलंही सरकार का प्रयत्न करत नाही? भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करतं? हे खरे समोर आणण्याची गरज आहे आणि ते आम्ही आणणार आहोत, असं बच्चू कडू म्हणालेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.