AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणानंतर तापमानात घसरण

महाराष्ट्रातील अनेक भागांत सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणानंतर तापमानात घसरण
महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस
| Updated on: May 13, 2025 | 8:47 AM
Share

महाराष्ट्रातील अनेक भागांत सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारीसुद्धा वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले आहे. दरम्यान, मंगळवारी १३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. उंड्री वडाचीवाडी परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नाशिकमध्ये २१ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने नाशिकला ‘यलो अलर्ट’ दिला होता. मात्र, दुपारनंतर परिस्थितीत बदल झाला असून तो ‘ऑरेंज अलर्ट’ करण्यात आला.

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिके आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते. उन्हाळी पिके, भुईमूग, हळद आणि आंब्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन-तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे.

वाशीमसह जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. वाशिम जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे तापमानाचा पारा कमी झाला आहे. वाशिम जिल्ह्याला पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास नागरिकांना होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यासह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीज पडून मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या चोरपांग्रा येथील 35 वर्षीय महिला रंजना चव्हाण यांचे अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक रंजना चव्हाण या त्यांच्या चोरपांग्रा शिवारातील शेतात कुटुंबासह कापूस वेचणीसाठी जात होत्या.

Follow Us
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.