AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणानंतर तापमानात घसरण

महाराष्ट्रातील अनेक भागांत सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणानंतर तापमानात घसरण
महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस
| Updated on: May 13, 2025 | 8:47 AM
Share

महाराष्ट्रातील अनेक भागांत सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारीसुद्धा वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले आहे. दरम्यान, मंगळवारी १३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. उंड्री वडाचीवाडी परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नाशिकमध्ये २१ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने नाशिकला ‘यलो अलर्ट’ दिला होता. मात्र, दुपारनंतर परिस्थितीत बदल झाला असून तो ‘ऑरेंज अलर्ट’ करण्यात आला.

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिके आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते. उन्हाळी पिके, भुईमूग, हळद आणि आंब्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन-तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे.

वाशीमसह जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. वाशिम जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे तापमानाचा पारा कमी झाला आहे. वाशिम जिल्ह्याला पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास नागरिकांना होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यासह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीज पडून मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या चोरपांग्रा येथील 35 वर्षीय महिला रंजना चव्हाण यांचे अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक रंजना चव्हाण या त्यांच्या चोरपांग्रा शिवारातील शेतात कुटुंबासह कापूस वेचणीसाठी जात होत्या.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.