AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

राज्यातील विविध जिल्ह्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली.

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस
| Updated on: Oct 10, 2020 | 4:47 PM
Share

मुंबई : राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीन, भात काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळं पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला. (Rain starts in various district of Maharashtra)

नवी मुंबईसह पनवेल मध्ये पावसाची हजेरी

आज दुपारी नवी मुंबईसह पनवेलमध्ये मेघगर्जनेसह पावासाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याप्रमाणे आज पावसानं हजेरी लावली. पनवेल, उरण विभागात अनेक ठिकाणी भात कापणीसाठी तयार झाले आहे. यावेळी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे.नवी मुंबईमध्येही विजेच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस झाला. पुण्यात जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन तीन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.  कोल्हापूरमधील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. प्रचंड मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने तारांबळ नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वाढत्या उकाड्यामुळं सकाळपासून नागरिक हैराण झाले होते त्यांना पावसामुळे दिलासा मिळाला.

सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोलापूर शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली. दुपारी अर्धा तासापासून औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद शहरात पावसाने हजेरी लावली. खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळं पिकांचं नुकसान झाल्यानं पून्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे.

हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात 15 दिवसाच्या विश्रांती नंतर काही भागात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतऱ्यांची धावपळ झाली. शेतकऱ्यांनी कापून टाकलेल्या सोयाबीनचं नुकसान होणार आहे.

वाशिम

वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. एका दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे.

संबंधित बातम्या :

Hingoli Rain | हिंगोलीत मुसळधार पाऊस, शेतीचं नूकसान

Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

(Rain starts in various district of Maharashtra)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.