AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

राज्यातील विविध जिल्ह्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली.

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस
| Updated on: Oct 10, 2020 | 4:47 PM
Share

मुंबई : राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीन, भात काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळं पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला. (Rain starts in various district of Maharashtra)

नवी मुंबईसह पनवेल मध्ये पावसाची हजेरी

आज दुपारी नवी मुंबईसह पनवेलमध्ये मेघगर्जनेसह पावासाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याप्रमाणे आज पावसानं हजेरी लावली. पनवेल, उरण विभागात अनेक ठिकाणी भात कापणीसाठी तयार झाले आहे. यावेळी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे.नवी मुंबईमध्येही विजेच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस झाला. पुण्यात जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन तीन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.  कोल्हापूरमधील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. प्रचंड मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने तारांबळ नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वाढत्या उकाड्यामुळं सकाळपासून नागरिक हैराण झाले होते त्यांना पावसामुळे दिलासा मिळाला.

सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोलापूर शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली. दुपारी अर्धा तासापासून औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद शहरात पावसाने हजेरी लावली. खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळं पिकांचं नुकसान झाल्यानं पून्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे.

हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात 15 दिवसाच्या विश्रांती नंतर काही भागात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतऱ्यांची धावपळ झाली. शेतकऱ्यांनी कापून टाकलेल्या सोयाबीनचं नुकसान होणार आहे.

वाशिम

वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. एका दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे.

संबंधित बातम्या :

Hingoli Rain | हिंगोलीत मुसळधार पाऊस, शेतीचं नूकसान

Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

(Rain starts in various district of Maharashtra)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.