AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरे कडाडले

MNS Vardhapan Din and Raj Thackeray: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पत्रकार नव्हते. हे बरे झाले. नाहीतर पत्रकार परिषदेत विचारलं असतं, महाराज तो गनिमी कावा सांगता का काय असतो तो? अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी पत्रकारांवर केली.

माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरे कडाडले
राज ठाकरे, नाशिक
| Updated on: Mar 09, 2024 | 1:32 PM
Share

चंदन पुजाधिकारी, नाशिक | दि. 9 मार्च 2024 : आपले विरोधक हे पत्रकारितेतही आहेत. ते सर्व गोष्टी पसवरतात. ते सुरुवात करतात. शेवट करत नाही. आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही? एक आंदोलन दाखवा. त्याचा शेवट नाही केला? बाकीच्यांना प्रश्न विचारत नाही. मागच्या सरकारने एक विषय पुढे ढकलला होता. त्याचं काय झालं. अरबी समुद्रात शिवस्मारक का नाही झालं? पंतप्रधान आले फुलं वाहून गेले. त्या फुलांचं काय झालं. अनेक गोष्टी आहेत. मनसेने जेवढी आंदोलने केली त्याचा शेवट केला. टोलनाके बंद झाले. मी पहिल्यापासून सांगत होतो, आपली भूमिका स्वच्छ होती. टोल तर जगभर चालतात. आमचं म्हणणं होतं टोलमधून पैसे येतात ते कुठून येतात आणि जातात कुठे? रस्ते नीट करता येत नाही आणि टोल वसूल करताय? मराठी पाट्या झाल्या. अनेक प्रार्थना स्थळावरचे भोंगे काढायचे म्हटलं बंद झाले भोंगे बंद झाले, अशी अनेक उदाहरणे मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या आंदोलनाची दिली. नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे सरकार कसे हिंदुत्ववादी

उद्धव ठाकरे यांचे सरकार हे डरपोक सरकार होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आम्ही भोंग्यावर बोललो. त्यांनी १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हे म्हणे हिंदुत्ववादी. या भोंग्यांचा मुस्लिमांना त्रास होतो. काल मुस्लिम मोहल्ल्यात गेलो होतो. आंदोलन झाल्यावर भोंगे बंद झालं. पण सरकारच ढिल्लं पडलं. एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो. बघू कुणात हिंमत आहे पुन्हा भोंगा लावण्याची. माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो, असे राज ठाकरे कडाडले.

अन्यथा महाराजांना विचारलं असतं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पत्रकार नव्हते. हे बरे झाले. नाहीतर पत्रकार परिषदेत विचारलं असतं, महाराज तो गनिमी कावा सांगता का काय असतो तो? त्या दिवशी मी आलो, पत्रकार परिषद घेतली. एकाने मला प्रश्न विचारला. मोदी महाराष्ट्रात फिरतात, सभा घेत आहे, तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील. म्हटलं, माझ्या लक्षातच आलं नाही, ते लोकसभेसाठी येत असतील. विलक्षण आहे. तू माझे डोळेच उघडले असं मी त्यांना सांगितलं. हा काय प्रश्न आहे? अशी टीका राज ठाकरे यांनी पत्रकारांवर केली.

हे ही वाचा

राष्ट्रवादीला पक्षच मानत नाही, शरद पवार नेहमी… राज ठाकरे यांची टीका काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.