AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये भी दिन निकल जाएंगे… ठाकरे गटाच्या नेत्याने काळजालाच हात घातला; राजन साळवी यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया काय?

राजन साळवी नेहमीच स्वत:ला निष्ठावंत म्हणायचे. असं म्हणणं नंतर नंतर चेष्टेचा विषय होतो. भाजपमध्ये राजन साळवींचा प्रवेश झाला नाही. साळवींच्या पक्ष प्रवेशापूर्वी सामंत बंधूंनी काय वक्तव्य केलं मला माहिती आहे. हे त्यांचं स्वागत आहे की कबड़्डी कबड्डी करून आपटणं आहे, हे येणाऱ्या काळात कळेलच, असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

ये भी दिन निकल जाएंगे... ठाकरे गटाच्या नेत्याने काळजालाच हात घातला; राजन साळवी यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया काय?
rajan salvi
| Updated on: Feb 13, 2025 | 5:29 PM
Share

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी तर काळजाला हात घालणारी प्रतिक्रिया दिली आहे. ये भी दिन निकल जाएंगे, अशी अत्यंत सूचक आणि बोलकी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

राजन साळवी यांच्या सारख्या जुन्या जाणत्या आणि मास लीडर असलेल्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा शिंदे गटात प्रवेशही होत आहे. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती. त्यांनी आहेत त्या ठिकाणी खंबीरपणे पाय रोवून उभे राहायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरे यांनी एकमेव निष्ठावंत म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. राजन साळवी दुसऱ्या पक्षात जात आहेत याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

थांबा, हे दिवस निघून जातील

पक्षप्रमुखांना ज्यांनी जायचं त्यांनी जावा असं म्हणण्याचा अधिकार आहे. पक्षप्रमुख हे बोलतात म्हणून आम्ही बोलायला लागलो हे चुकीचं आहे. पदाधिकाऱ्यांनी अशा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ये भी दिन निकल जाएंगे असा आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. थांबा, हे दिवसही निघून जातील, आपण एकत्र लढू, असं भास्कर जाधव यांनी म्हणाले.

एकमेव, एकनिष्ठ कुणाला म्हणायचे?

शिलेदार नेता आणि सरदार आहात म्हणून हे सरदारकीचे लक्षण नाही (विनायक राऊत यांना टोला) सरदारांनी आपल्या सैन्याला धीर दिला पाहिजे. असं वक्तव्य म्हणजे पळ काढण्यासारखं आहे. राजन साळवी आपला उल्लेख करताना एकमेव एकनिष्ठ असे म्हणायचे. आता एकमेव एकनिष्ठ कोणाला म्हणायचं हे रत्नागिरीत आल्यानंतर त्यांना विचारा, ते उत्तर देतील, असा टोला त्यांनी लगावला.

टायगर अभी जिंदा है

उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. रोज एक माणूस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांना खेचलं जात आहे. त्यामुळे लोक अमिषाला बळी पडत आहे. आम्ही जाणाऱ्यांना थांबवत नाही, राजकारणात, व्यवहारात सूडाचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे 13 खासदार, 40 आमदार फोडूनही उद्धव साहेब दबावाला बळी पडत नाहीत म्हणून या लोकांची झोप उडाली आहे. टायगर अभी जिंदा हैं, असं ते म्हणाले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.