AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये भी दिन निकल जाएंगे… ठाकरे गटाच्या नेत्याने काळजालाच हात घातला; राजन साळवी यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया काय?

राजन साळवी नेहमीच स्वत:ला निष्ठावंत म्हणायचे. असं म्हणणं नंतर नंतर चेष्टेचा विषय होतो. भाजपमध्ये राजन साळवींचा प्रवेश झाला नाही. साळवींच्या पक्ष प्रवेशापूर्वी सामंत बंधूंनी काय वक्तव्य केलं मला माहिती आहे. हे त्यांचं स्वागत आहे की कबड़्डी कबड्डी करून आपटणं आहे, हे येणाऱ्या काळात कळेलच, असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

ये भी दिन निकल जाएंगे... ठाकरे गटाच्या नेत्याने काळजालाच हात घातला; राजन साळवी यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया काय?
rajan salvi
| Updated on: Feb 13, 2025 | 5:29 PM
Share

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी तर काळजाला हात घालणारी प्रतिक्रिया दिली आहे. ये भी दिन निकल जाएंगे, अशी अत्यंत सूचक आणि बोलकी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

राजन साळवी यांच्या सारख्या जुन्या जाणत्या आणि मास लीडर असलेल्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा शिंदे गटात प्रवेशही होत आहे. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती. त्यांनी आहेत त्या ठिकाणी खंबीरपणे पाय रोवून उभे राहायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरे यांनी एकमेव निष्ठावंत म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. राजन साळवी दुसऱ्या पक्षात जात आहेत याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

थांबा, हे दिवस निघून जातील

पक्षप्रमुखांना ज्यांनी जायचं त्यांनी जावा असं म्हणण्याचा अधिकार आहे. पक्षप्रमुख हे बोलतात म्हणून आम्ही बोलायला लागलो हे चुकीचं आहे. पदाधिकाऱ्यांनी अशा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ये भी दिन निकल जाएंगे असा आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. थांबा, हे दिवसही निघून जातील, आपण एकत्र लढू, असं भास्कर जाधव यांनी म्हणाले.

एकमेव, एकनिष्ठ कुणाला म्हणायचे?

शिलेदार नेता आणि सरदार आहात म्हणून हे सरदारकीचे लक्षण नाही (विनायक राऊत यांना टोला) सरदारांनी आपल्या सैन्याला धीर दिला पाहिजे. असं वक्तव्य म्हणजे पळ काढण्यासारखं आहे. राजन साळवी आपला उल्लेख करताना एकमेव एकनिष्ठ असे म्हणायचे. आता एकमेव एकनिष्ठ कोणाला म्हणायचं हे रत्नागिरीत आल्यानंतर त्यांना विचारा, ते उत्तर देतील, असा टोला त्यांनी लगावला.

टायगर अभी जिंदा है

उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. रोज एक माणूस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांना खेचलं जात आहे. त्यामुळे लोक अमिषाला बळी पडत आहे. आम्ही जाणाऱ्यांना थांबवत नाही, राजकारणात, व्यवहारात सूडाचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे 13 खासदार, 40 आमदार फोडूनही उद्धव साहेब दबावाला बळी पडत नाहीत म्हणून या लोकांची झोप उडाली आहे. टायगर अभी जिंदा हैं, असं ते म्हणाले.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?