AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? संजय पवार यांचं मोठं विधान, भाजपने मात्र सस्पेन्स कायम ठेवला

भाजपने दोनच उमेदवार दिले आहे. तिसऱ्या उमेदवाराचा सस्पेन्स भाजपने कायम ठेवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. असे विधान संजय पवार यांनी केलं आहे. आता संजय पवारांचं हे विधान किती खरं ठरतं? हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल. 

Rajyasabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? संजय पवार यांचं मोठं विधान, भाजपने मात्र सस्पेन्स कायम ठेवला
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 29, 2022 | 8:49 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या चर्चा आहे ती फक्त आणि फक्त राज्यसभा निवडणुकीची (Rajyasabha Election) या सहा जागांच्या निवडणुकीने राज्यतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सहा जागांसाठी काँग्रेस (Congress) वगळता सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. शिवसेनेकडून (Shivsena) दोन जणांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपकडून दोन जणांना उमेदवारी देण्यात आलीय. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला एक उमेदवार दिला आहे. त्यात आता शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. भाजपने दोनच उमेदवार दिले आहे. तिसऱ्या उमेदवाराचा सस्पेन्स भाजपने कायम ठेवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. असे विधान संजय पवार यांनी केलं आहे. आता संजय पवारांचं हे विधान किती खरं ठरतं? हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.

राज्यसभेसाठी आतपर्यंत फायनल झालेले उमेदवार

  1. राज्यसभेसाठी सर्वात आधी शिवसेनेकडून संजय राऊत आणि नंतर संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संभाजीराजे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. यावरून बराच राजकीय वादही रंगला.
  2. दुसरीकडे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीनेही संभाजीराजे यांना आधी पाठिंबा देऊ म्हणत पुन्हा आमची मतं शिवसेनेलाच असा पवित्रा घेतला. तसेच राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली.
  3. आज भाजपने आपले उमेदावर कोण असतील हे स्पष्ट करत पियुष गोयल आणि अनिल बोंडे ही दोन नावं जाहीर करून टाकली आहेत. मात्र तिसरा उमेदवार भाजपने न दिल्याने संजय पवार यांनी ही विधान केलं आहे. मात्र भाजपच्या गोटातला ससपेन्स सहाव्या जागेसाठीचा अद्याप कायम आहे.
  4. काँग्रेसनेही आपल्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. कारण काँग्रेसने अद्यापही कुणाचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे काँग्रेस कुणाला उमेदवारी देतं? हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.

भाजप तिसरा उमेदवार देणार की नाही?

भाजपने आज दोनच नावं जाहीर केली आहेत. संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने परवानगी दिल्यास आम्ही तिसरा उमेदवार देऊ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटलांच्या सुरात सूर मिळवत फडणवीसही याच भूमिकेत दिसून आले होते. मात्र अजूनही भाजपने उमेदवार दिला नाही, तसेच उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्यापर्यंत भाजपने उमेदवार दिला नाही. तर ही निवडणूक बिनविरोधच होणार आहे. त्यामुळे संजय पवार यांचं विधान खरं ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड