AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hathras | योगी सरकारचे CBI चौकशीचे आदेश, गुन्हेगारांना पाठिशी घातले जाणार नाही- रावसाहेब दानवे

हाथरस प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू आहे. गुन्हेगार कोणीही असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. (Raosaheb Danave comment on Hathras case investigation)

Hathras | योगी सरकारचे CBI चौकशीचे आदेश, गुन्हेगारांना पाठिशी घातले जाणार नाही- रावसाहेब दानवे
| Updated on: Oct 04, 2020 | 9:02 PM
Share

लातूर: हाथरस प्रकरणात चौकशी सुरू आहे. योगी सरकारने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत, गुन्हेगार कोणीही असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत हे सांगण्यासाठी रावसाहेब दानवे लातूर मध्ये आले होते. दानवे यांना पत्रकारांनी हाथरस प्रकरणी प्रश्न विचारताच पत्रकार परिषद आटोपण्यात आली. (Raosaheb Danave comment on Hathras case investigation)

हाथरस प्रकरणाची चौकशी सुरू होती, त्यात अडथळा येऊ नये म्हणून मीडियाला थांबवण्यात आले होते. त्यानंतर मीडियाला परवानगी देण्यात आली, अशी भूमिका रावसाहेब दानवेंनी मांडली. राहुल गांधींना कोणीही धक्का बुक्की केली नाही. मात्र, त्यांना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही त्यामुळे ते पडले. विरोधी पक्षाचे नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असे रावसाहेब दानवेंनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे. राज्य सरकारने व्यवस्थित मांडणी केली नसल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली, असे राबसाहेब दानवे म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यासांठी कसे लाभदायक आहेत. हे सांगण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांनी जालना, उस्मानाबाद आणि लातूरचा दौरा केला. उस्मानाबाद आणि लातूर मध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

लातूर येथील पत्रकार परिषदेत ते शेतकरी कायदे कसं चांगल आहे हे सांगत होते. मात्र, त्यांचं निवेदन संपल्याबरोबर पत्रकारांनी हाथरसमध्ये योगी सरकार असे वागले? पोलीस अधीक्षकाची बदली झाली, जिल्हा धिकाऱ्यांची का नाही, असे अनेक प्रश्न सुरू विचारणे सुरू केल्यानंतर दानवेंनी तपासानंतर बोलू असं सांगत पत्रकार परिषद आटोपली. पत्रकार परिषदेला लातूरमधील भाजप नेते उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

Hathras Case | हाथरस प्रकरणावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

(Raosaheb Danave comment on Hathras case investigation)

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.