Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास निलेश राणे यांचं काय?

Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-भाजपामध्ये संघर्ष होऊ शकतो. शिवसेना शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. नारायण राणे सुद्धा या मतदारसंघातील वजनदार नेते आहेत.

Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास निलेश राणे यांचं काय?
nilesh rane
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 8:05 AM

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त काही महिने उरले आहेत. शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट एकत्र आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच आव्हान आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये अजून जागा वाटपाची बोलणी सुरु झालेली नाहीत. पण प्रत्येक पक्षाने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केलीय. काही पक्ष आतापासूनच काही जागांवर दावा करत आहेत. प्रत्यक्ष जागा वाटचपाची चर्चा होईल, त्यावेळी या मुद्यारुन महायुती-महाआघाडीमध्ये धुसफूस होऊ शकते.

महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष होऊ शकतो. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून किरण सामंत यांच्यासाठी हालचाली सुरू आहेत. विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून किरण सामंत यांना उमेदवारी द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे. किरण सामंत हे उदय सामंत यांचे सख्खे बंधू आहेत. सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे.

नारायण राणे यांचा बालेकिल्ला

सध्या किरण सामंत हे रत्नसिंधू या शासकीय योजनेचे सदस्य म्हणून काम करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून पर्यटन आणि मच्छिमार बांधवांसाठी मोठं काम केलं आहे. किरण सामंत यांचं नाव चर्चेत असलं, तरी या जागेवर भाजपाकडून सुद्धा दावा केला जाऊ शकतो. सध्या केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वजनदार नेते आहेत. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण 2014 पासून त्यांचं वर्चस्व कमी होत गेलं. सर्वप्रथम निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत त्यानंतर नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. उदय सामंत काय म्हणाले?

मागच्या 10 वर्षांपासून विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्गच लोकसभेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. आज नारायण राणेंच्या रुपाने भाजपाकडे वजनदार नेता आहे. त्यामुळे भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. निलेश राणे यांचा मतदारसंघात चांगला जनसंर्पक आहे. त्यामुळे या जागेवरुन युतीमध्ये संघर्ष होऊ शकतो. “किरण सामंत हे माझे सख्खे भाऊ आहेत. मात्र त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण ते निवडणुकीला उभे राहिले, तर त्यांना तीन ते साडेतीन हजार मतांनी निवडून आणू” असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.