AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धानोरकरांना तिकीट ते विखे-थोरात वाद, काँग्रेसमधील धुसफुशीची 7 कारणे

मुंबई: काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नाराजी वाढल्यानं अखेर दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा लोकसभा उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादीचा नको तितका हस्तक्षेप वाढल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढतोय. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वानं गंभीर दखल घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाअंतर्गत कलह संपता संपत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पक्षावरची मजबूत कमांड कमी झाली […]

धानोरकरांना तिकीट ते विखे-थोरात वाद, काँग्रेसमधील धुसफुशीची 7 कारणे
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

मुंबई: काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नाराजी वाढल्यानं अखेर दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा लोकसभा उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादीचा नको तितका हस्तक्षेप वाढल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढतोय. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वानं गंभीर दखल घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाअंतर्गत कलह संपता संपत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पक्षावरची मजबूत कमांड कमी झाली म्हणून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतून नेत्यांना मुंबईत यावं लागलं. या नेत्यांनी काँग्रेसमधला कलह कमी करण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती आहे.

दिल्लीतून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी के सी वेण्णूगोपाल आणि नव नियुक्त महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक मधुसुदन मिस्त्री मुंबईत आले. त्यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. पण निवडणूक दृष्टीकोनातून ही बैठक असल्याचं सांगण्यात आलं.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात धुसफूस का आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.

  1. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून बाळू धानोरकर या आयात उमेदवाराला तिकीट दिलं
  2. सांगलीची जागा काँग्रेसची असताना ती सोडत स्वाभिमान पक्षाला दिली, त्यामुळं वसंतदादा पाटील कुटुंब नाराज झालं
  3. पुणे लोकसभा उमेदवारीत शरद पवार यांच्या आग्रहावरून काँग्रेस पक्षावर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाच काँग्रेस पक्षात प्रवेश दिला
  4. लातूरमध्ये अमित देशमुख यांची विनंती धुडकावत मच्छिंद्रचंद्र कामत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे देशमुख नाराज झाले
  5. रणजित निंबाळकर यांनी सातारा जिल्हाध्यक्ष पद सोडून भाजपात प्रवेश करत थेट उमेदवारी मिळवली
  6. नगर लोकसभा जागेवरुन विखे, तर औरंगाबाद लोकसभा जागेवरुन अब्दुल सत्तार नाराज झाले
  7. नगरमध्ये विखे-थोरात वाद थांबवण्यात अपयश आलं. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो.

काँग्रेसचा निवडणुकीत आक्रमक पवित्रा दिसायला हवा होता, तो त्या तुलनेनं दिसत नाही. त्यामुळे आधीच पक्षात मरगळ आली की काय असं वाटू लागलं आहे. एकीकडे राष्ट्रवादी प्रचारात आघाडीवर असताना, काँग्रेस मात्र बँकफूटवर आहे. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वाची दखल महत्त्वाची ठरत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.