AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या केळगावात दंगल, पोलिसांच्या गोळीबारानंतर काय आहे परिस्थिती?

आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे.

औरंगाबादच्या केळगावात दंगल, पोलिसांच्या गोळीबारानंतर काय आहे परिस्थिती?
| Edited By: | Updated on: Dec 12, 2020 | 10:47 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावत दंगल उफाळली आहे. विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. दीडशे ते दोनशे गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Riots in Aurangabad Villagers attack accused house police fire in air)

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस पाटील महिलेचा आरोपीने सातत्याने विनयभंग केला होता. त्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळवून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी पोलीस पाटील महिलेने व्हीडीओ केला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे.

या जीवघेण्या घटनेमध्ये पीडित थोडक्यात बचावली असून त्यांच्यावर सिल्लोडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरंतर, या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं होतं. पण त्याला जामीन मिळाल्यामुळे गावकरी संतापले होते. त्यामुळे त्यांनी थेट घरावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये आरोपीच्या घराची मोडतोड करण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस व्हॅनवरही दगडफेक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत पाच राउंड फायर करत गोळीबार करण्यात आला. यामुळे सध्या गावाला छावणीचं स्वरूप आलं असून हल्लेखोरांची धरपकड सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (Riots in Aurangabad Villagers attack accused house police fire in air)

इतर बातम्या –

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

नागपूरमधील रेडलाईट एरियात पोलिसांची मोठी कारवाई, 8 अल्पवयीन मुलींची सुटका, 100 ग्राहक ताब्यात

(Riots in Aurangabad Villagers attack accused house police fire in air)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.