AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान…!

लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. या संमेलनाचे निमंत्रण अध्यक्ष भारत सासणे यांना त्यांच्या घरी जावून देण्यात आले आहे.

Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान...!
Sahitya Sammelan
| Updated on: Jan 09, 2022 | 7:06 AM
Share

नाशिकः अखेर उदगीरमध्ये होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. उदगीर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची निवड झाली आहे. यापूर्वी नाशिकमध्ये गेल्याच महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर होते.

कोणत्या तारखांना संमेलन?

उदगीरमध्ये होणारे साहित्य संमेलन 22 ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीर ही संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी सासणे यांच्या पुणे येथील घरी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना संमेलनाचे निमंत्रण आणि अभिनंदन पत्र देण्यात आले. लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसा उदगीर हा सीमावर्ती भाग. या परिसरात मराठी, कन्नड, उर्दू आणि तेलगू या भाषा बोलल्या जातात. या संमेलनात या चारही भाषांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रकांनी अध्यक्षांना दिली.

हिंडता-फिरता अध्यक्ष

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यापूर्वीच्या नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष जयंत नारळीकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळे कौतिकराव ठाले-पाटील यांनी आता पुढचा अध्यक्ष हिंडता-फिरता रहावा, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कोरोनाचे सावट

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले की, एप्रिलमध्ये उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. एप्रिल बावीस ते चोवीस दरम्यान तीन दिवशी कार्यक्रम होतील. संमेलनाचे निमंत्रण नवीन अध्यक्षांना दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र, दुसरीकडे यंदाही साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असणार आहे. त्यामुळे हे संमेलन कदाचित मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये घ्यावे लागू शकते. जर कोरोनाची तिसरी लाट ओसरली, तर संमेलन दणक्यात होईल.

इतर बातम्याः

Special News| साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे अनकट अन् डोळ्यांत अंजन घालणारे स्फोटक भाषण…!

Nashik| मी या भाषेत फडफडत राहीन, कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन; अन् अख्खे कविसंमेलन भारावले…!

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.