AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी भिडेंची जीभ घसरली, अपत्यहीन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य

हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वावर बोलताना 'वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते' असं खालच्या पातळीचं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं

संभाजी भिडेंची जीभ घसरली, अपत्यहीन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य
| Updated on: Dec 26, 2019 | 8:22 AM
Share

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वावर बोलताना ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते’ असं खालच्या पातळीचं वक्तव्य भिडेंनी केलं. संभाजी भिंडेंनी मातृत्वावरुन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य केल्यामुळे राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जणांनी सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त (Sambhaji Bhide on Childless Woman) केला आहे.

सांगलीत नागरिकत्व सुधारणा (सीएए) कायदा आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर बोलताना संभाजी भिडे यांनी स्त्रीत्वाचा अनादर करणारं वक्तव्य केलं. ‘जसं नपुंसकात पुरुषत्व कमी असतं, तस वांझेमध्ये स्त्रीत्व कमी असतं. त्यांना आपण नपुंसक आणि वांझ असे शब्द वापरतो. तसंच हिंदूंचं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे’, असं संभाजी भिडे म्हणाले.

जेव्हा राष्ट्रवादाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होतो. भारतात मुस्लिम समाजाकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करणं ‘मूर्खपणाचं’ आहे, असंही भिडे म्हणाले. नागरिकत्व सुधारणा (सीएए) कायद्याविषयी भिडे सांगलीमध्ये बोलत होते.

राष्ट्रहिताच्या प्रश्नावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडतो, मात्र काही जण याविषयी भ्रम पसरवतात, असंही संभाजी भिडे म्हणाले.

संभाजी भिडे यांची जीभ घसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. नाशिकमध्ये एका व्याख्यानादरम्यानही त्यांनी असंच चमत्कारिक विधान केलं होतं. ‘माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे’ असा अजब दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्यानंतरही भिडेंवर टीकेची झोड उठली होती.

भिडेंना पुण्यात जिल्हाबंदी

संभाजी भिडे आणि ‘हिंदू एकता आघाडी’चे मिलिंद एकबोटे यांना पुण्यात चार दिवसांची जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकबोटे आणि भिंडेंसह एकूण 163 आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

Sambhaji Bhide on Childless Woman

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.