AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?; अंबादास दानवे म्हणाले, आमदारांना केवळ…

Ambadas Danve on Cabinet expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच इतर राजकीय घडामोडींवरही भाष्य केलंय. वाचा...

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?; अंबादास दानवे म्हणाले, आमदारांना केवळ...
| Edited By: | Updated on: Jun 16, 2024 | 8:35 PM
Share

लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्रात चर्चा होतेय ती राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची… आता लवकरच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही मंत्र्यांची खाती बदलली जातील तर काही आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलंय. या सरकारमध्ये आता कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. हे आता केवळ आमदारांना लॉलीपॉप दाखवत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार केल्यावर सरकारला जास्त प्रॉब्लेम निर्माण होतील, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

बोर्डाच्या जमिनी सरकार दरबारी करू माझं तर असा आरोप आहे आणि विशेषता गृहमंत्र्यावर ज्या गरिमांच्या प्रॉपर्टी आहेत निर्वाचितांच्या प्रॉपर्टी आहेत. त्या सुद्धा सरकार स्वार्थ हेतूने विकायचा सपाटा लावला आहे आणि विकलेले आहेत. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा जमिनी विकल्या आहेत. चारशे पार कशासाठी पाहिजे तर हे हळूहळू समोर येत आहे. म्हणजेच घटना बदलण्यासाठी पाहिजे होतं आणि भाजप असेच सांगत आहे. विरोधकांनी नॅरोटीव्ह सेट केला. ही सत्यता टी राजासिंह यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय, असंही दानवे म्हणाले.

आरक्षण प्रश्नावर प्रतिक्रिया

प्रकाश अण्णा शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांची भूमिका त्यांनी मांडली आहे. परंतु सरकारने ज्या ज्या गोष्टीचे आश्वासन दिले आहे, ते केले पाहिजे, असंही अंबादास दानवे म्हणाले.

सांगलीच्या लढतीवर भाष्य

सांगलीच्या लोकसभेच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला. संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या तिघांमध्ये झालेली तिरंगी लढत विशाल पाटलांनी जिंकली. यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आता निवडणूक झाली आहे. विशाल पाटील जिंकलेले आहेत. त्यांनी हा आनंद जनतेच्या कामासाठी खर्च घातला तर बरे होईल. आता जे झाले त्याच्यावर चर्चा करणे हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.