AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?; अंबादास दानवे म्हणाले, आमदारांना केवळ…

Ambadas Danve on Cabinet expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच इतर राजकीय घडामोडींवरही भाष्य केलंय. वाचा...

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?; अंबादास दानवे म्हणाले, आमदारांना केवळ...
| Edited By: | Updated on: Jun 16, 2024 | 8:35 PM
Share

लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्रात चर्चा होतेय ती राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची… आता लवकरच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही मंत्र्यांची खाती बदलली जातील तर काही आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलंय. या सरकारमध्ये आता कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. हे आता केवळ आमदारांना लॉलीपॉप दाखवत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार केल्यावर सरकारला जास्त प्रॉब्लेम निर्माण होतील, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

बोर्डाच्या जमिनी सरकार दरबारी करू माझं तर असा आरोप आहे आणि विशेषता गृहमंत्र्यावर ज्या गरिमांच्या प्रॉपर्टी आहेत निर्वाचितांच्या प्रॉपर्टी आहेत. त्या सुद्धा सरकार स्वार्थ हेतूने विकायचा सपाटा लावला आहे आणि विकलेले आहेत. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा जमिनी विकल्या आहेत. चारशे पार कशासाठी पाहिजे तर हे हळूहळू समोर येत आहे. म्हणजेच घटना बदलण्यासाठी पाहिजे होतं आणि भाजप असेच सांगत आहे. विरोधकांनी नॅरोटीव्ह सेट केला. ही सत्यता टी राजासिंह यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय, असंही दानवे म्हणाले.

आरक्षण प्रश्नावर प्रतिक्रिया

प्रकाश अण्णा शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांची भूमिका त्यांनी मांडली आहे. परंतु सरकारने ज्या ज्या गोष्टीचे आश्वासन दिले आहे, ते केले पाहिजे, असंही अंबादास दानवे म्हणाले.

सांगलीच्या लढतीवर भाष्य

सांगलीच्या लोकसभेच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला. संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या तिघांमध्ये झालेली तिरंगी लढत विशाल पाटलांनी जिंकली. यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आता निवडणूक झाली आहे. विशाल पाटील जिंकलेले आहेत. त्यांनी हा आनंद जनतेच्या कामासाठी खर्च घातला तर बरे होईल. आता जे झाले त्याच्यावर चर्चा करणे हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.

Follow Us
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....
आमचे दोन किंवा तीन उमेदवार... बच्चू कडूंच्या पक्ष प्रवेशाबाबत उदय सामं
आमचे दोन किंवा तीन उमेदवार... बच्चू कडूंच्या पक्ष प्रवेशाबाबत उदय सामं.
मविआत तणाव शिगेला! ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला, बिनविरोध....
मविआत तणाव शिगेला! ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला, बिनविरोध.....
सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल
सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल.