AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ही ऑफर की ट्रॅप? काल उद्धव ठाकरे म्हणाले आणि आज संजय राऊत, बंडखोर आमदारांना मुंबईत आणलं की गेम पलटणार?

काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत गुवाहाटीत बंड पुकारलेल्या आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा हेच आवाहन करताना, सरकारच्या पाठिंब्याबाबतही मोठं विधान केलं.

Sanjay Raut : ही ऑफर की ट्रॅप? काल उद्धव ठाकरे म्हणाले आणि आज संजय राऊत, बंडखोर आमदारांना मुंबईत आणलं की गेम पलटणार?
संजय राऊतImage Credit source: tv9
| Updated on: Jun 23, 2022 | 3:42 PM
Share

मुंबई : मुंबईतून संजय राऊत यांनी गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेना (Shiv Sena) आमदारांना अल्टिमेटम दिला. शिवाय त्यांची गोची करणारं वक्तव्यही केलं. सरकारमधून (MVA) बाहेर पडण्यास शिवसेना तयार आहे, असं वक्तव्य मी जबाबदारीने करतोय, असं शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलंय. पण त्यासाठी त्यांनी एक अटक घातली आहे. 24 तासांत तुम्हाला मुंबईत यावं लागेल, शिवसेना पक्षप्रमुखांसमोर तुमची जी मागणी आहे, त्यावर चर्चा करावी लागेल. यानंतर आपण मिळून योग्य तो निर्णय घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. इतकंच काय तर गुवाहाटी बसून केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारालाही त्यांनी टोला लगावलाय. जे काय म्हणणं आहे, ते मुंबईत येऊनच करा, अशा स्पष्ट शब्दांत संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

ऑफर की ट्रॅप?

शिवसेना आमदारांना मुंबईत आणण्यासाठीचं हे ट्रॅप आहे का, अशी शंका आता उपस्थित केली जाते आहे. खरंच ट्रॅप आहे की ऑफर आहे, यावरुन राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या वक्तव्याचे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या आवाहनाला आता एकनाथ शिंदे गट नेमका कसा प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे पत्रकारांना सांगितलं. त्यावेळी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेतेही सोबत होते. या पत्रकार परिषदेच्या शेवटी शेवटी संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्यासाठीची शिवसेनेची तयारी असल्याचं विधान करताना बंडखोर आमदारांसमोर एक प्रस्तावही ठेवला. आता हा प्रस्ताव मान्य करत एकनाथ शिंदे गट येत्या 24 तासात मुंबईत येणार का, हा खरा प्रश्न आहे.

काल ठाकरे, आज राऊत..

काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत गुवाहाटीत बंड पुकारलेल्या आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा हेच आवाहन करताना, सरकारच्या पाठिंब्याबाबतही मोठं विधान केलं. या विधानानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून खरंत शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल का, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपसोबत जायचं नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम होता. ज्या प्रकारे शिवसेनेने गेल्या काळात भाजपवर टीका केली आहे. त्यानुसार संजय राऊतांची वक्तव्य तपासली, तर त्यांनी अनेकदा भाजपविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. आता बंडखोर आमदार सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यास सांगत आहेत. हा निर्णय घेतला गेला, तर भाजपसोबत शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी कितीपत तयार होईल, याबाबतही बंडखोर शिवसेना आमदारांना शंका आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून आधी बाहेर पडा, मग पुढचा परतण्याचा विचार करुन, अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.