AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

शिवसेना कोणाची, कोर्टाच्या आगामी निकालावरून संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आगामी निकालावरून राऊत यांनी थेट गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
sanjay raut newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 10:41 AM
Share

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरूच आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रक्षा बंधनाच्या दिवशी मुंबईत आले होते. मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवादावरून उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली. सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ असून सर्व मंत्री आणि आमदार घाबरले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर टीका 

खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी अमित शहांना सांगितलं की, साहेब, आमचे आमदार आणि मंत्री फार घाबरले आहेत. सर्व जण धक्क्यात आहेत. त्यांचे साहेब म्हणाले, काय झालं? त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून अस्वस्थ आहेत’. त्यावर अमित शहा म्हणाले, ‘मी आहे, टेन्शन घेऊ नका’. गेल्या महिन्यात संसदेचं अधिवेशन सुरू असताना गद्दार खासदार हे शिंदे पुत्रांसोबत अमित शहांना भेटले. तेव्हाही दोन खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी देखील अमित शहा यांनी सर्व काही ठिक होईल, असे सांगितले. त्याची चिंता करू नका. सर्व माझ्यावर सोपवा’. देशाचं सुप्रीम कोर्ट यांच्या खिशात आहे का? उघडपणे सुप्रीम कोर्टावर भाष्य केले जात आहे. अशामुळे देशावरील न्यायव्यवस्थेचा विश्वास नष्ट होतो’.

‘अमित शहा मुंबईत येतात किंवा दिल्लीत बसतात. त्यावेळी गद्दार जाऊन भेटतात. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिंता करू नका, असं म्हणतात. फडणवीसही तसंच म्हणतात. राहुल नार्वेकरही सांगतात, मी जे सांगितलं, तोच निकाल. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री तेच सांगत आहे. आता न्यायालयांना कळवणं, हेच आमचं कर्तव्य आहे, असे राऊतांनी पुढे सांगितले.

सत्याचा विजय होईल – संजय राऊत

संजय राऊत यांनी आमचा न्यायालय आणि संविधानावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. सत्य आणि धर्माचा विजय होणार असून न्यायव्यवस्था ही अधर्माच्या बाजूने जाणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. बुडत्याचा पाय खोलात, असं काल त्यांच्याबाबतीत झाल्याची टीका राऊतांनी केली.

Follow Us
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...