AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत… संजय राऊत यांचा अत्यंत मोठा गाैप्यस्फोट, थेट…

संजय राऊत यांनी अनेक गोष्टींवर थेट भाष्य केले. यासोबतच त्यांनी अजित पवार भाजपासोबत नक्की का गेले याबद्दलही खुलासा केला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची आता जोरदार चर्चा रंगत आहे. त्यांनी भाजपावरही आरोप केले.

एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत... संजय राऊत यांचा अत्यंत मोठा गाैप्यस्फोट, थेट...
Sanjay raut
| Updated on: Feb 24, 2026 | 10:15 AM
Share

संजय राऊत यांनी नुकताच मोठा दावा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण भाजपा तसे होऊ देणार नाही. त्यांना भाजपामध्ये जावे लागेल, तिथे काही वेळ काढावा लागेल, तेव्हा कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतात, त्याशिवाय नाही. हे आमचे सर्व सहकारी होते त्यांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केले आहे. तेव्हा त्यांना शिवसेना फोडायची होती म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी म्हटले की, सुप्रीम कोर्ट हे भाजपाचे कार्यकर्ते आहे. सुप्रीम कोर्टातील बरेच न्यायाधिश हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, ते त्या पद्धतीने काम करतात. तुम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करता. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या सुप्रीम कोर्टाला मुर्ख म्हटलं, ज्यावेळी त्यांनी टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यावेळी ट्रंपने त्यांच्या कोर्टाच्या न्यायाधिशाला मुर्ख म्हटले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या कोर्टाला मुर्ख म्हटले… का मुर्ख म्हटले… ते सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे, इतकेच मी सांगेन. लोकशाहीमध्ये आमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलाय. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थोडीजरी लोकशाहीचे काही असेल तर त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे. पुण्याच्या हणमंत पवार मारहाण प्रकरणात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केले.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, विचारांची लढाई आपण विचारांनी करायचे बोलतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडेही विचार असावा लागतो ना..भाजपाकडे कोणता विचारच नाही. हिंदू मुसलमान यापेक्षा कोणता विचार आहे का त्यांच्याकडे? कोणताच विचार त्यांच्याकडे नाही… राजकीय विचार नाही, सामाजिक विचार नाही, सांस्कृतिक विचार नाही, सामाजिक विचार नाही… विचार असेल तर आम्ही विचारांची लढाई करू असेही राऊतांनी म्हटले.

जिव नकोसा होईल आणि तो इतका नकोसा करायचा की, तो आपला पक्ष सोडून तुमच्या पक्षात जाईल, इथंपर्यंत जीव नकोसा करायचा. हे अजित पवारांच्या बाबतीत झाले आहे आणि हे आम्ही डोळ्यांनी बघितले. अजित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे काय मनापासून भारतीय जनता पक्षाचा जवळ गेले नाहीत. हे आपली कातडी वाचायला आणि संपत्ती वाचवण्याकरिता गेले, असेही राऊतांनी म्हटले.

Follow Us
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....