AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊतांचे मोठे संकेत, थेट म्हणाले, स्थानिक पातळीवर…

नुकताच ठाकरे बंधूच्या युतीवर संजय राऊत यांनी मोठे विधान केले. यासोबतच त्यांनी दिल्लीच्या बैठकीत काय घडले, यावर देखील भाष्य केले. मराठीच्या मुद्दावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सांगितले जातंय. यावरच आता भाष्य करण्यात आलंय.

ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊतांचे मोठे संकेत, थेट म्हणाले, स्थानिक पातळीवर...
Sanjay Raut
| Updated on: Aug 09, 2025 | 10:30 AM
Share

नुकताच संजय राऊत यांनी दिल्लीतील बैठकीत काय घडले हे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले की, दोन बंधू मराठीच्या प्रश्नावर एकत्र येत असतील तर कोणाला काय समस्या असेल आणि याबद्दल दिल्लीमध्ये चर्चा करण्याचा काही विषय नाही. कारण स्थानिक पातळीवर दोन बंधू एकत्र येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हा इंडिया आघाडीचा विषय नाहीये. परप्रांतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाहीये. मराठी कोणी बोलणार नाही, म्हटल्यावर भडका उडतो.

ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल राऊतांचे मोठे विधान 

पुढे संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत महाविकास आघाडीत कोणालाही आक्षेप नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अद्याप कोणतीही आघाडी नाहीये. आम्ही दिल्लीत जातो, आम्ही आमच्या अटी -शर्यतीवर दिल्लीत जातो. कोणाची लाचारी पत्कारून आम्ही दिल्लीत जात नाहीत, हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. जो लाचारांचा गट होता, तो तुमच्यासोबत आहे, जे शेपट्या हालवत तुमच्यमागे दिल्लीत फिरतो. यामुळे फडणवीसांनी आम्हाला स्वाभिमानाचा विषय सांगू नये.

आमची कोणत्याही संघर्षासाठी तयारी 

आमची कोणत्याही संघर्षासाठी तयारी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच कार्यक्रमाला वरळीत हजेरी लावली, यावेळी काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आमचे त्यावर लक्ष होते. पण आम्ही कोणत्याही संघर्षासाठी आता तयार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हणत थेट मोठा इशाराच दिला आहे.

राऊतांनी केली देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका 

निवडणूक आयोगाच्या विरोधातील आमचा लढा कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. आम्ही राहुल गांधी यांच्याकडून आशावादी आहोत, असेही त्यांनी म्हटले. यावेळी संजय राऊत हे दिल्ली बैठकीत काय काय घडले हे सांगताना देखील स्पष्टपणे दिसले. उद्धव ठाकरे यांना दिल्लीतील बैठकीत मागच्या रांगेत बसवल्याचे सांगत टिका केली जात आहे. याचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. त्यावरही राऊतांनी थेट भाष्य केले आणि मागच्या रांगेत बसण्याचे थेट कारण सांगितले.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?