AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का?, शपथविधीची तारीख जाहीर केल्याने संजय राऊत यांचा संतप्त सवाल

Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का?, शपथविधीची तारीख जाहीर केल्याने संजय राऊत यांचा संतप्त सवाल
संजय राऊत
| Updated on: Dec 01, 2024 | 11:24 AM
Share

महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबतची चर्चा महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या पाच तारखेला शपथविधी होणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावरून बावनकुळे यांना टोला लगावला आहे. भाजपचे प्रांत अध्यक्ष सांगत आहेत की पाच तारखेला शपथविधी होणार आहे. हे काय राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का?, असा सवाल थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे. राज्यपालांनी यांना सांगितलं आहे का? राज्यपाल यांनी कळविले आहे का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला तयार नाही का घाबरले आहात का? याला सर्वस्वी जबाबदार डी वाय चंद्रचूड आहेत. सुप्रीम कोर्ट आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

शिंदेंचं सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललं आहे. जस्टीस डी. वाय. चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून महाराष्ट्र असेल, संबळचा विषय हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य करून देशांमध्ये एका प्रकारची आग लावली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं तर डी वाय चंद्रचूड होते. आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजी वाहू सरकार आहे केअरटेकर गव्हर्मेंट हे देखील संविधानाच्या खिलाफ आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

26 तारखेला या सरकारची, 14 व्या विधानसभेची मुदत संपलेली आहे. विधानसभेची नवीन विधानसभा 26 तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं. पण त्यांचे भाडोत्री पंडित काहीही कागदपत्र आणून दाखवतील… आम्ही जर असतो. आमचं सरकार असतं तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लावली असती हे मी वारंवार सांगतो, असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे.

राऊतांचा भाजपला टोला

अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून आठ दिवस होऊन गेले. यांना एवढं बहुमत आहे, यांनी निकालानंतर 24 तासात सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे होता. अद्याप यांच्या कोणीही सरकार स्थापनेच्या दावा का केला नाही? यांच्याकडे बहुमत आहे ना… मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष इतका मोठा नेते इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.