AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात… संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती, म्हणाले मोदींमुळेच…

खासदार संजय राऊत यांनी अमेरिका-इराण युद्धावरून मोदी सरकारवर टीका केली असून, भारत 'गुलाम' झाला असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील पुतळे आणि अजित पवार यांच्या मृत्यूवरही भाष्य केले.

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात... संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती, म्हणाले मोदींमुळेच...
sanjay raut pm narendra modi
| Updated on: Mar 01, 2026 | 11:24 AM
Share

सध्या अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी संजय राऊतांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या वृत्तावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, हे युद्ध केवळ परदेशात मर्यादित नाही. पंतप्रधान मोदी दोन दिवसांपूर्वीच इस्रायलहून परतले आणि दुसऱ्याच दिवशी इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटले. हा योगायोग असू शकत नाही. मोदींचे ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी जवळचे संबंध आहेत. तर मग युद्ध सुरू होतानाच त्यांनी ते थांबवायला हवे होते, असे संजय राऊतांनी म्हटले.

काश्मीर प्रश्नावर इराण नेहमी भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. भारताला इराणकडून अत्यंत स्वस्त दरात तेल मिळत होते. आता या युद्धाचा परिणाम म्हणून तेलाचे भाव वाढून महागाईचा फटका भारताला बसेल, अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केली. यावेळी संजय राऊतांनी भारताने अमेरिकेशी केलेल्या ट्रेड डीलवरही टीका केली. या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

युद्धजन्य परिस्थितीत इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून संजय राऊत यांनी परराष्ट्र खात्यावर निशाणा साधला. इराणमधील विमानतळांवर हल्ले झाले आहेत. पर्यटकांसह अनेक भारतीय तिथे अडकले आहेत. पुण्यातले एक कुटुंबही अडकले आहे. भारतीय परराष्ट्र खाते आता काय करणार? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

यावेळी संजय राऊतांनी दिल्लीतील लुटियन्स भागात पुतळे हटवण्यावरूनही राऊत यांनी सरकारला घेरले. लुटियन्स हे केवळ आर्किटेक्ट नव्हते. मॅडम कामा यांनी काँग्रेसची स्थापना केली होती, तर सी. राजगोपालचारी हे मोठे नेते होते. त्यांचे पुतळे हटवून काय साध्य होणार? मोदी विदेशी घड्याळ आणि गाड्या का वापरतात? इंग्लंडच्या पंतप्रधानांना मिठी का मारतात? मग स्वदेशीचे काय झाले? असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...