AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्याचे घर जळत असताना काही जणांना आनंद, स्वतःचे जळते घर वाचवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

या निवडणुकीचा परिणाम हा देशातील लोकसभा निवडणुकीवर होणार नाही. तसेच महाराष्ट्रावरही या निवडणुकीचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण यापूर्वीचे अडीच वर्षांचे कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिलेलं आहे.

दुसऱ्याचे घर जळत असताना काही जणांना आनंद, स्वतःचे जळते घर वाचवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
| Updated on: May 13, 2023 | 6:47 PM
Share

सातारा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे. जनमताच्या कौलाचा आदर करणारे आम्ही लोकं आहोत. एखाद्या राज्याच्या निकालावर आपण सर्व देशाचे अनुमान बांधू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यात भाजपला विजय मिळला नव्हता. पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा देशात स्पष्ट बहुमत असणारा पक्ष होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.

हे स्वतःची पाठ थोपाटून घेण्यासारखे

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होती. मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्याच्या निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. एखाद्या राज्याच्या निवडणुकीवरून संपू्र्ण देशावर त्याचा परिणाम होईल. असा अंदाज व्यक्त करणे म्हणजे स्वतःची पाठ थोपाटून घेण्यासारखे आहे.

कोमात आणि जोमात हा फरक जनतेला कळतो

या निवडणुकीचा परिणाम हा देशातील लोकसभा निवडणुकीवर होणार नाही. तसेच महाराष्ट्रावरही या निवडणुकीचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण यापूर्वीचे अडीच वर्षांचे कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिलेलं आहे. आमचं सरकार हे जोमात काम करत आहे. कोमात आणि जोमात हा फरक जनतेला कळतो. महाराष्ट्रातील जनतेला काम करणारे लोकं पाहिजे. घरी बसलेले लोकं आवडत नाहीत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

अशा योजनांचा लाभ मिळेल

राज्यातील जनता सुज्ञ आहे. काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनता राहते. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता राहते. पुढच्या कालावधीत आम्ही दुप्पट वेगाने काम करू. शासन आपल्या दारी अशा योजनांचा लाभ आपल्याला मिळेल.

पुढच्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना-भाजप पूर्ण ताकतीने लढेल. आणि पूर्ण बहुमताने जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

काही लोकं आसुरी आनंद घेणारी

कर्नाटकात पराभव कोणाचा, विजय कोणाचा झाला, हे सर्वांना माहीत आहे. दुसऱ्याचे घर जळत असताना काही लोकं आनंद घेतात. पण, स्वतःचे घर जळते, याकडे त्याचे लक्ष नसते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आसुरी आनंद घेणारी काही लोकं आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.