AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवित्र पोर्टलबाबत करत होते घोषणाबाजी, शिक्षण मंत्र्यांनी चांगलंच झापलं

अनुदान दिले नाही की सरकार वाईट आहे, असं बोलंलं जातं.

पवित्र पोर्टलबाबत करत होते घोषणाबाजी, शिक्षण मंत्र्यांनी चांगलंच झापलं
दीपक केसरकरांनी यांना सुनावलं
| Updated on: Oct 02, 2022 | 5:46 PM
Share

शंकर देवकुळे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, सांगली : पवित्र पोर्टलमुळे शिक्षक भरतीत चांगले दर्जेदार शिक्षक मिळत नाही ते असत्य आहे. असं मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. पवित्र पोर्टलबाबत घोषणाबाजी करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना केसरकर यांनी चांगलंच झापलं. केसरकर म्हणाले, पाहुणा म्हणून बोलवलं आहे. त्यामुळे पाहुण्यांचा आदर करा. मागणी करा. त्यावर विचार होईल. पण तात्काळ निर्णय जाहीर करा म्हणणं बरोबर नाही. असंही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भर भाषणात सांगितलं.

अनुदान दिलं नाही तर सरकार वाईट

अनुदान दिले नाही की सरकार वाईट आहे, असं बोलंलं जातं. मुलांची शिष्यवृत्ती वाढवायची असेल तर मला विचार करावा लागतो, असंही मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

सरकार आणि शिक्षणसंस्था यात कायम एक प्रकारचा संघर्ष राहिला आहे, ही वस्तुस्थिती आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळेऐवजी क्लस्टर करून त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवास खर्च देता येईल, असं त्यांनी यावेळी सूचविलं.

निर्णय घेताना विचार करावा लागतो

प्रती विद्यार्थी खर्च मर्यादित असावा लागेलच. कारण बजेटचा पण विचार करावा लागेल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व विचार करून घ्यावा लागेल.

सरकार आणि शिक्षणसंस्था समन्वय असावा लागेलच. बजेटचा विचार करून सर्वांनी एकत्र बसून निर्णय घावे लागतील, असं दीपक केसरकार यांनी सांगितलं.

काही लोकं फक्त अनुदानासाठी शाळा काढतात

मोर्चे काढणे सरकारला दुसणे देणे बंद झाले पाहिजे. सरकार मोठ्या प्रमाणात भरती करणार आहे. काही लोकं केवळ अनुदानासाठी शाळा काढतात. काही चांगल्यासाठी शाळा काढतात, असं संस्थाचालकांना दीपक केसरकर यांनी खडसावलं.

Follow Us
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....