AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपाचा शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का, बदलली पूर्ण समीकरणेच…

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. यादरम्यान अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीमध्येही आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगताना दिसले.

मोठी बातमी! भाजपाचा शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का, बदलली पूर्ण समीकरणेच...
BJP Shiv Sena Thackeray group
| Updated on: Dec 01, 2025 | 9:54 AM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तारखांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे. राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत. स्थानिक पातळीवरची समीकरणे पाहून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बऱ्याच ठिकाणी युती म्हणूनही लढले जात आहे. बदलापूर नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बहुचर्चित बदलापूर नगरपरिषद निवडणूक होताना दिसतंय. त्यामध्येच आता तिसरी आघाडीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पाच उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेत महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या तिसरी आघाडी या संस्थेच्या सात उमेदवारांनी भाजपाला दिला पाठिंबा दिला आहे. ऐन निवडणुकीत या संस्थेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, संस्थेकडे निवडणूक चिन्ह नसल्याने ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवीत होते. अचानक कविता सकट, वैभव सदाफुले, मंगेश इंगळे, रुपेश साळवी ,प्रफुल कांबळे या पाच उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

पाचही जण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नसून त्यांच्यात तिसरी आघाडी होती. त्यामुळे या संस्थेकडे चिन्ह नसल्याने आम्ही त्यांना मशाल चिन्ह दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत या पाचही उमेदवारांना महाविकास आघाडीच्या मतदारांनी मतदान करू नये, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले आहे.

आता यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल असे किशोर पाटील यांनी म्हटले आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना राज्यात मोठ्या घडामोडी घडताना सध्या दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी आपली ताकद लावली जात आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्रही चांगलीच रंगताना दिसत आहे. आता या निवडणुकीमध्ये कोणाचे वर्चस्व राहते हे बघण्यासारखे ठरेल. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल आणि 3 डिसेंबर 2025 रोजी निकाल लागेल.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...