AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जवान जीवानिशी गेला, शहापूरचे बे अक्कल पोलिस म्हणतात खड्डा दिसला नाही का?

विकास गोरे यांच्या कुटुबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ केल्याचाही आरोप केला आहे.

जवान जीवानिशी गेला, शहापूरचे बे अक्कल पोलिस म्हणतात खड्डा दिसला नाही का?
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 1:13 PM
Share

मुंबई ते नाशिक महामार्गावरील भलेमोठे खड्डे प्रवासादरम्यान जीवघेणे ठरू लागले आहे. कालच शहापूरच्या नदी पुलावरील खड्ड्यामुळे अपघात झाल्याने टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्यानंतरही प्रशासनचं अजिबात लक्ष नसल्याचे दिसत आहे. विकास गोरे यांच्या जाण्याने एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. पोलिसांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का? असे पोलिसांनी सांगितल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची भाषा, कुटुंबाचा आरोप 

शहापुरातील एका खड्ड्याने एका घराचा आधार हिरावला आहे. विकास गोरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा आक्रोश केला जात आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळल्याने ठाणे अग्निशामक दलातील टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यासाठी कुटुंबीयांची शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?” असा उलट सवाल पोलिसांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. तक्रार नोंदविण्याऐवजी मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची भाषा केल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

कुटुंबाकडून आर्थिक मदतीची मागणी  

विकास गोरे यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. “देशासाठी धावणारा माझा पती गेला. आता दोन जुळ्या मुलींचे संगोपन कसे करायचे?” असा सवाल गोरे यांच्या पत्नीने केला. प्रशासनाने मुलींना आर्थिक मदत करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी पत्नीने मागणी केली. दिवंगत विकास गोरे यांच्या आईने म्हटलं की, ‘रस्त्यावरती अपघात घडला तरी माझा मुलगा त्यांना मदत करायचा. मात्र माझ्या मुलाला कोणीच थांबून मदत केली नाही. आमच्या घराचा आधारच निघून गेला. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी विकासने उचलली होती. मोठा भाऊ खाजगी कंपनीत काम करत असला तरी घराचा मुख्य आधार विकासच होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.

विकासचे काका म्हणाले, ठेकेदारांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून गेलो होतो. मात्र पोलिसांनी उलट आम्हालाच सुनावले’. तर विकासच्या भावाने आरोप करताना म्हटलं की, ‘इशादवाडी ,”बदलापूर पूर, भिवंडीसारख्या मोठ्या आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालणारा माझा भाऊ आज खड्ड्याचा बळी ठरला. विकास म्हणतात मात्र विकासाचाच बळी खड्ड्यामुळे या लोकांनी घेतला. पोलीस हे जवानाच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे न राहता ठेकेदारांना वाचवत आहेत, असा संतप्त आरोप नातेवाईकांनी केलाय.

कारवाई कधी करणार? 25 तासांनंतरही गुन्ह्यांची नोंद नाही 

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळून टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू होऊन २५ तास उलटले, तरी ठेकेदार वा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल नाही. घटनास्थळी सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्याने फक्त आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांकडून केवळ एडीआर नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने चौकशी सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी “खड्डा दिसला नाही का?” असे सांगत जबाबदारी मृत जवानावर ढकलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नातेवाईकांनी केला. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोप फेटाळले आहेत. तर डीवायएसपींनी यासंदर्भात सीसीटीव्ही किंवा संबंधित कोणी प्रत्यक्षदर्शी आढळल्यास चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले. आपत्तीमध्ये इतरांचे जीव वाचवणारा जवान खड्ड्याचा बळी ठरल्यानंतरही कारवाई होत नसल्याने कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं