शनिशिंगणापूरला जाताय तर आता 500 रुपयांची पावती करा; भूमाता ब्रिगेडचा निर्णयाला विरोध; निर्णय मागे घेण्याची विनंती

मोठ्या श्रद्धेने शनिदेवावर तेल अर्पण करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भाविकांची उपस्थिती या मंदिरात असते. शनिदेव संस्थानकडून शनिवारपासून ही सशुल्क सेवा सुरू करण्यात आल्याने राज्यातून आणि बाहेरून येणाऱ्या सामान्य भाविकांना 500 रुपये आता लागणार आहेत.

शनिशिंगणापूरला जाताय तर आता 500 रुपयांची पावती करा; भूमाता ब्रिगेडचा निर्णयाला विरोध; निर्णय मागे घेण्याची विनंती
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:16 PM

अहमदनगर: शनिशिंगणापूर (Shanishingnapur) येथील चौथऱ्यावर जावून भक्तांना आता देवाला स्वतः तेलाचा अभिषेक करता येणार आहे. शनिदेव संस्थानकडून शनिवारपासून ही सशुल्क सेवा (Paid service) सुरू करण्यात आली आहे मात्र भक्तांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Bhoomata Brigade Tripti Desai) यांनी आक्षेप घेतला आहे. महिला व पुरुष भक्तांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन व तेलाभिषेक करता येणार असल्याने ट्रस्टींच्या या निर्णयाचे स्वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, मात्र 500 रुपयांच्या पावतीचा निर्णय चुकीचा असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

हा निर्णय गरीब आणि श्रीमंत भक्तांमध्ये भेदभाव करणारा आहे. या निर्णयाला आमचा विरोध असून हा निर्णय विश्वस्त मंडळाने मागे घ्यावा अन्यथा भूमाता ब्रिगेड आवाज उठवणार असल्याचा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

राज्यातील शनिशिंगणापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे राज्यासह कर्नाटक, गुजरात या राज्यातूनही या ठिकाणी शनिभक्त दर्शनासाठी येत असतात.

भाविकांना 500 रुपये

भक्ती असल्याने अनेक भाविक या ठिकाणी शनिदेवाला तेलाचा अभिषेक घालतात. ही परंपरा असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने शनिदेवावर तेल अर्पण करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भाविकांची उपस्थिती या मंदिरात असते. शनिदेव संस्थानकडून शनिवारपासून ही सशुल्क सेवा सुरू करण्यात आल्याने राज्यातून आणि बाहेरून येणाऱ्या सामान्य भाविकांना 500 रुपये आता लागणार आहेत. त्यामुळे गरीब आणि सामान्य माणसांना याचा मोठा फटका बसणार असल्याने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी विरोध दर्शविला आहे.

भूमाता ब्रिगेडकडून या निर्णयाला विरोध

ज्या भाविकांना शनिदेवाला तेल अभिषेक करायचा आहे, त्यांना देणगी म्हणून 500 रुपाये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे भूमाता ब्रिगेडकडून या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. या देणगीमुळे गरीब आणि सामान्य भक्त जे येणार आहेत, त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार त्यामुळे तृप्ती देसाई यांनी सांगितले की, विश्वस्तांनी हा निर्णय जरी घेतला असला तरी या निर्णयामुळे गरीब श्रीमंतर अशी दरी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.