AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचा पुढचा प्रवास कसा असेल? शरद पवारांचं अवघ्या 3 शब्दांत उत्तर! काय म्हणाले?

उद्धव ठाकरे लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात, हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदे यांच्याकडे दिली होती. त्याचा कदाचित बंडखोरी हा परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचा पुढचा प्रवास कसा असेल? शरद पवारांचं अवघ्या 3 शब्दांत उत्तर! काय म्हणाले?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारImage Credit source: tv9
| Updated on: Jun 30, 2022 | 10:22 PM
Share

मुंबई/पुणे : उद्या जेव्हा ठाकरे लोकांमध्ये जातील आणि लोकांना मत द्यायची संधी मिळेल, त्यावेळी चित्र बदललेले असेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस म्हणून शपथविधी झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) आणि शिवसेना पक्षासोबत आता कमी आमदार उरले आहेत. तर त्यांचे भवितव्य काय असेल, असे विचारले असता त्यांनी ठाकरेंना जनतेत अधिक मिसळण्याचेच अप्रत्यक्ष सांगितले आहे. तर बंडखोरीसारखे प्रकार लोक खपवून घेत नाहीत. त्यांना ते आवडत नाही, हे उदाहरणासह स्पष्टही केले. त्यासोबतच बंड होत असतात. मात्र शिवसेना (Shivsena) संपणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘संघटनेची जबाबदारी शिंदेंकडे होती’

उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात, हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदे यांच्याकडे दिली होती. त्याचा कदाचित बंडखोरी हा परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असे ते म्हणाले.

‘शिवसेना संपुष्टात येणार नाही’

शिवसेना संपुष्टात आली नाही. येणार नाही. बंड होत असतात. या पूर्वी भुजबळांनी बंड केले होते. आमच्या पक्षात आले. काही झाले नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केले. तेही पराभूत झाले. साधारण शिवसेनेत असे आज झाले नाही. ज्यांनी बंड केले, त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते, असे ते म्हणाले.

‘बंड केल्यावर काय होते?’

बंड केल्यानंतर काय होते, याचेही उदाहरण त्यांनी दिले. ते म्हणाले, की 1981मध्ये माझ्या नेतृत्वात 67 आमदार निवडून आले. सहा महिन्याने निवडणूक झाल्यावर मी सुट्टीला गेलो होतो. दहा दिवसाने परत आलो. त्यावेळी माझ्यासह सहा लोक राहिले. मी 67 आमदारांचा विरोधीपक्ष नेता होतो. मी पाच लोकांचा नेता राहिलो. माझे पदही गेले. पण त्यानंतर निवडणूक झाली. मला सोडून गेलेल्या सर्वांचा पराभव झाला आणि माझी टीम ७३ झाली, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले शरद पवार?

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.