AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदमांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी

रामदास कदम यांच्या ठाकरे कुटुंबीयांवरील विधानाचे राजकीय पडसाद आता उमटायला लागले असून सेनेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

रामदास कदमांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 20, 2022 | 5:33 PM
Share

नाशिक : शिंदे गटात (Eknath Shinde) सहभागी असलेल्या रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक होतांना दिसून येत आहे. नाशिकमधील शिवसैनिक (Shivsena) देखील आक्रमक झाले होते. दापोली येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले आहे. शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी देत पुतळ्याचे दहन देखील केले. नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती शिवसेना कार्यालय शालीमार येथे हे आंदोलन करण्यात आले होते. रामदास कदम यांचा शिवसैनिकांनी निषेध नोंदवत हल्लाबोल केला आहे.

दापोली येथे एका कार्यक्रमात ठाकरे कुटुंबाबद्दल रामदास कदम यांनी आक्षेपार्ह विधान केले होते त्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहे.

नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती शिवसेना कार्यालय शालिमार या ठिकाणी रामदास कदम यांच्या पुतळ्याच दहन करत शिवसैनिकांनी निदर्शने करत निषेध नोंदवला.

रामदास कदम यांच्या ठाकरे कुटुंबीयांवरील विधानाचे राजकीय पडसाद आता उमटायला लागले असून सेनेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

कदम यांच्या विरोधात आता संपूर्ण राज्यात शिवसेनेकडून आंदोलन केले जात असून रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

रामदास कदम हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर देखील कदम यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता तेव्हापासूनच कदम आणि ठाकरे यांच्यात संघर्ष अधिक चिघळला आहे.

कदम हे कधीकाळी मातोश्री जवळचे पदाधिकारी म्हणून ओळखले जायचे, त्यांना सेनेकडून विरोधी पक्षनेते पासून मंत्रीपद देखील देण्यात आले होते.

कदम आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार होत असतांना कदम मातोश्रीबद्दल विधान करत असल्याने शिवसैनिक कदम यांच्याविरोधात आंदोलन करीत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.