जळगाव : राज्यात शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. तर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी सेनेलाच आवाहन दिले आहे. तर आताचा शिवसेना ही खरी नसून आसाममध्ये एकत्र आलेल्या आमदारांची सेना हीच खरी शिवसेना आहे. जे बाळासाहेबांच्या विचारांवर आणि सेनेच्या कृतीवर चालते अस शिंदे यांनी म्हटलं. त्यानंतर फुटणारी सेना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहोत मात्र सगळ्यांनी परत या अशी भावनिक साद घातली. त्यानंतर राज्यात शिवसेनेची खरी ताकद असाणारा सामान्य शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. तर जळगावात शिवसैनिकांनी आपले प्रेम आणि सेनेप्रति असणारी निष्ठा दाखवून दिली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील शिवसैनिकांनी (ShivSainik in Bhadagaon) रक्ताने पत्र लिहून (writing letters with blood) आपले समर्थन हे उद्धव ठाकरे यांना असल्याचे दाखवून दिले. तसेच याचवेळी त्यांनी जे आमदार फुटले आहेत त्यांनाही भावनिक साद घातली आहे. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांना पुन्हा परत येण्याचे भावनिक आवाहन केले आहे.