AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाराज शिलेदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा, सबुरीचा सल्ला; नेमकं काय दिलं आश्वासन?

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेतील काही नेते नाराज आहे, नाराज शिलेदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.

नाराज शिलेदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा, सबुरीचा सल्ला; नेमकं काय दिलं आश्वासन?
eknath shinde
| Updated on: Dec 20, 2024 | 3:40 PM
Share

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे महायुतीमधील मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या आमदारांसोबतच सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराने महायुतीमधील अनेक आमदारांचा अपेक्षाभंग केला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपदासाठी दावेदार असलेले मात्र संधी न मिळू शकलेले शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत, यातील काहींनीतर आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. यामध्ये शिवसेनेचे नेते तानाजी सावंत, अब्दुल सत्तार,  विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान आज विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

मी विश्वासाने सांगतो, ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळालं नाही ते पक्षाचं काम करतील, संघटना वाढवण्यासाठी काम करतील, दुसऱ्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद मिळेल. ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले आहे, ते दुसऱ्या टप्प्यात पक्षासाठी काम करतील. मंत्रि‍पदासाठी श्रद्धा, सबुरी ठेवावी लागते. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली त्यांना पक्ष संघटनेत स्थान मिळेल. आता आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना एक कुटुंब आहे, त्यामुळे कोणी कुठेही जाणार नाही. पद येतात जातात, पदापेक्षा आमचं उत्तरदात्वीय हे लोकांशी जी नाळ जोडली आहे त्याच्याशी आहे. अडीच वर्षात आम्ही तेच केलं प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला दोन परप्रांतीय कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली, यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कल्याणच्या घटनेबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली आहे, संबंधितांवर कारवाई देखील केली आहे. मराठी माणसांची अस्मिता जपण्यासाठीच शिवसेनेची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्रात मराठी माणसाचा कोणालाही अपमान करता येणार नाही, कोणाचाही मुलाहीजा ठेवला जाणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.