राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंची नितीन गडकरी यांच्यावर जहरी टीका, थेट म्हटले, गडकरींचे..
नुकताच उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका सरकारवर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही गडकरी यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिराच्या मुद्द्यात त्यांनी टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर नितीन गडकरी होते. गडकरींवर उद्धव ठाकरेंनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, एक आठवड्यापूर्वी भेटलो होतो. हिंदुत्वाच्या नावावर जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याविरोधात आंदोलन पुकारलं होतं. रविवारी शिवसैनिकांनी दादरच्या हनुमान मंदिरासमोर महाआरती केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. 18 तारखेला नागपूरला कार्यक्रम होणार आहे. मी स्वत: जाणार आहे. हिंदूने झोपून राहू नये, जागं राहिलं पाहिजे. हिंदुचा दुरुपयोग करून लुटण्याचं काम करत असतील तर त्यांना जागा दाखवली पाहिजे. देशात विचित्र परिस्थिती आहे. देशात बऱ्याच वर्षात विरोधी पक्षाला काम आहे. जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. गडकरींचं ते काम आहे. पण ते इथेनॉलवर बोलत आहेत.
पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी एका विषयासाठी आलो आहे. लोक बोलत नाहीत. जंतरमंतरवर दीपकेने जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. नीटचे परीक्षा पेपर फुटले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी लक्ष दिले. सरकारला वेळ नाही. खासदार फोडाफोडीकडे त्यांचं लक्ष आहे. विद्यार्थ्यांचं नशीब फुटलं आहे. सोनम वांगचूक आणि दीपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.
वांगचुक भेटून गेले. त्यांच्या बुद्धिमतेचा वापर केला पाहिजे. 16 दिवसापासून ते आमरण उपोषण करत आहेत. चार दिवसापूर्वी मी अरविंद सावंत यांना त्यांना भेटायला गेले होते. मी त्यांच्याशी फोनवरून बोललो. आंदोलन करू नका. तुमची गरज आहे, असं म्हटलं. पण सरकारला त्यांची गरज नाही. एक एक व्यक्ती गेला तर सरकारला ते पाहिजेच आहे. असं नाईलाजाने म्हणावं लागतंय.
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. एक क्षण आला आहे, सर्व जणांनी सर्व विषय घेण्याची आवश्यकता नाही. पण एखाद्या विषयावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे असं म्हणतोय. पक्षाचे झेंडे घेऊन जावं असं म्हणत नाही. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
