AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपात एकही लाडकी बहीण त्या पदासाठी योग्य नाही का?’, सुषमा अंधारेंनी पुन्हा डिवचलं

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील अद्याप नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली नाहीये, यावरून सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे.

'भाजपात एकही लाडकी बहीण त्या पदासाठी योग्य नाही का?', सुषमा अंधारेंनी पुन्हा डिवचलं
सुषमा अंधारे
| Updated on: Nov 29, 2024 | 5:33 PM
Share

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. गेल्या आठवड्यात या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात केवळ 50 जागाच जिंकता आल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला वीस जागा, काँग्रेस 16 तर सर्वात कमी जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निवडून आल्या.राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशातून सावरत महायुतीनं राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजप 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार 41जागांवर विजयी झाले.

मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील अजूनही महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये.समोर आलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा महायुती आणि शिवसेना शिंदे गटाला डिवचलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या वाचाळ प्रवक्त्यानं म्हटलं होतं की जर 48 तासात सरकार स्थापन नाही झालं तर 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.आता 5 डिसेंबरला शपथविधी आहे.एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. 5 तारखेपर्यंत हे राज्य कोणाच्या भरवशावर चालणार आहे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे.लाडक्या बहि‍णींना सत्तेत वाटा मिळणार आहे की नाही? भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दुसरीकडे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. जर गृहमंत्रिपद मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार आहेत. अन्यथा शिवसेनेच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात