‘गावाच्या विकासासाठी मित्र, मात्र राज्यात शत्रू’, कल्याणच्या मानिवली ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप युती

कल्याण तालुक्यातील मानिवली गावात सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीवेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे (ShivSena and BJP alliance in Kalyan Manivali gram panchayat)

'गावाच्या विकासासाठी मित्र, मात्र राज्यात शत्रू', कल्याणच्या मानिवली ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप युती
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 5:48 PM

कल्याण (ठाणे) : शिवसेना आणि भाजपमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही एकमेकांविरोधात कमालीची फूट पडली आहे. शिवेसना-भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात ठाकले आहेत. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दृढ संबंध होताना दिसत आहे. असं असतानादेखील कल्याण तालुक्यातील मानिवली गावात सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीवेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार किसन कथोरे यांनी या युतीचं समर्थनदेखील केलं आहे (ShivSena and BJP alliance in Kalyan Manivali gram panchayat).

मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-भाजपने एकत्रित येत भाजपचा सरपंच तर शिवसेनेचा उपसरपंच बसविला आहे. राज्यात काही वाद असो गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असं वक्तव्य निवडून आलेल्या सरपंच-उपसरपंचांनी केलं आहे (ShivSena and BJP alliance in Kalyan Manivali gram panchayat).

कल्याण तालुक्यातील उर्वरीत दहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पाडली. सरपंचपदासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याशिवाय प्रत्येक पक्षाने आपला सरपंच बसवण्याच्या दावा केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कल्याण तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये एक-दुसऱ्याला पाण्यात बघणारे पक्ष एकत्र आले आहेत.

नऊ सदस्य असलेल्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये तीन शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि तीन इतर निवडून आले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप एकत्रित आले. त्यामुळे सरपंचपदी भाजपच्या माया गायकर या बिनविरोध निवडून आल्या. तर शिवसेनेचे चंद्रकांत गायकर हे उपसरपंचपदी निवडून आले. या दोन्ही पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ठाणे, पालघर जिल्ह्याचे भाजप सचिव निलेश शेलार यांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, राज्यात काही असू द्या गावाच्या विकासाठी आम्ही एकत्रित आल्याची भावना नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंचांनी व्यक्त केली आहे.

सरपंच निवडीवेळी भाजपचे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे देखील उपस्थिता होते. “गावाच्या विकास कामात राजकारण होता कामा नये. गावकऱ्यांनी विकासाकरीता  एकत्रित येण्याचे ठरविले असेल. त्याला भाजपचा पाठिंबा आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? : नाना पटोले

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.