AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंना दिल्लीत कोण बोलवणार? फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांच सडेतोड उत्तर

Sanjay Raut : देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रत्युत्तर दिलं.

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंना दिल्लीत कोण बोलवणार? फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांच सडेतोड उत्तर
Sanjay Raut - Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: May 25, 2023 | 10:27 AM
Share

मुंबई : “देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. आमचा नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध नाहीय. संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घ्यावं, ही आमची भूमिका आहे. आमचा मुद्दा संवैधानिक आणि नैतिक आहे. देशाच्या घटनेवर संविधानावर हल्ला होतोय याला आमचा विरोध आहे” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी नकुतेच तीन देशाच्या दौऱ्यावरुन परतले. पापुआ गिनीया या आश्चर्यकारक देशात जाऊन आले. त्यांनी आता या विषयात लक्ष घालावं. राष्ट्रपती भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करावं व या सर्व वादावर पडदा घालावा” असं संजय राऊत म्हणाले.

‘देशाच्या राष्ट्रपतींना बोलवत नाही, तिथे आमचं काय?’

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेत दोन तास थांबत नाहीत, त्यांना दिल्लीला कोण बोलवणार? या टीकेला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “सध्या लोकशाहीवादी, देशभक्तांना दिल्लीत बोलावल जात नाही. चमचे, चाटूगिरी करणारे आणि मोदींच भजन करणाऱ्यांना दिल्लीला बोलावल जातं. देशाच्या राष्ट्रपतींना बोलावल जात नाही, तिथे आमचं काय?” असं संजय राऊत म्हणाले. गद्दारांची गाडी चालवण्याची फडणवीसांवर वेळ

“राष्ट्रपतींच्या सहीने संसद सुरु होते. लोकशाही भूमिका ठरवण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्या संविधानाच्या प्रमुख आहेत” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकण्याची वाईट वेळ आलेली नाही. बाळासाहेबांनी कधीच व्यक्तीला विरोध केला नाही. भूमिकेला विरोध केला. देवेंद्र फडणवीस गद्दारांच्या गाड्या चालवतायत काय वाईट वेळ आलीय” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.