AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेढा, साप, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात भयानक माहिती

लिंगपिसाट अशोक खरातची आज आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यानंतर त्याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात नेमकं काय घडलं जाणून घ्या...

पेढा, साप, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात भयानक माहिती
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 24, 2026 | 4:55 PM
Share

महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरातला आज (२४ मार्च) नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची मागील पोलीस कोठडीची मुदत आज संपली होती. दुपारी ३.५० वाजता खरातला न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तो आता २९ मार्चपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहील. दरम्यान, न्यायालयात सरकारी वकीलांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यामध्ये अशोक खरातच्या घरात सापडलेल्या रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने पाच नरबळी दिल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

न्यायालयात काय घडले?

-खरात येण्यापूर्वीच कोर्टरूममध्ये वकिलांची मोठी गर्दी झाली होती.

-सरकारी वकील अजय मिसर (एसआयटीकडून) कोर्टात हजर झाले.

-आरोपीचा पुकारा झाल्यानंतर सुमारे १७ मिनिटांनी खरातला न्यायालयात आणण्यात आले.

-खरातला तोंडावर काळा कपडा बांधून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणले होते. आरोपीच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायाधीशांनी त्याला कोर्टरूमच्या बाजूला उभे करण्याचे आदेश दिले.

-सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील कोर्टात उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, “मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली मारेन.”

सरकारी वकील अजय मिसर यांनी सादर केलेले मुद्दे

-अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ आणि ‘कॉस्मोलॉजी’चा अभ्यासक म्हणवत होता. त्याच्याकडे काही प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

-त्याच्या ताब्यातून ६ लाख ५३ हजार रुपये रोख, लॅपटॉप आणि काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर (त्यावर राजमुद्रा असलेले) जप्त करण्यात आले.

-रिव्हॉल्व्हरमध्ये ३१ काडतुसे आढळली, त्यातील ५ काडतुस फायर झालेल्या आहेत. हे फायर कुठे केले? नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

-फार्महाऊसमध्ये ५ रिकाम्या पिस्तुलाच्या गोळ्या सापडल्या आहेत. त्यांचा शोध घेतला जाणार.

-खरात ६७ वर्षांचा असून, तो ३० वर्षांच्या तरुणींसोबत लैंगिक शोषण करत होता, यावरून त्याची विकृत मानसिकता स्पष्ट होते.

-तो वाघ, साप, नाग दाखवत होता. ते जिवंत होते की नकली? याचा तपास सुरू आहे.

-हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिल्याचा दावा करत तो फसवणूक करायचा. हरणाची हत्या केल्याचा संशय आहे.

-वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत (Forest Act) गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

-प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली.

अशोक खरातचे वकील काय म्हणाले?

-यापूर्वी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

-हा गुन्हा सेक्स, फसवणूक आणि मालमत्ता संबंधित आहे.

कोर्टात खरातचे वर्तन

-युक्तिवाद सुरू असताना अशोक खरात मान खाली घालून उभा होता आणि आपले बोट बघत होता.

-न्यायाधीशांनी त्याला विचारले, “काही बोलायचे आहे का?”

-त्यावर खरात म्हणाला, “मला साप, वाघ याविषयी काही माहिती नाही.”

-न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून ५ दिवसांची (२९ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.

Follow Us
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.