AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं टाळलं पण उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल

तुम्ही अडीच वर्षे घरी बसून काम केलं, राज्याला मागे नेलं असा टोला देखील शिंदे यांनी लगावला यावेळी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देखील शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सूनावलं आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं टाळलं पण उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 26, 2022 | 3:18 PM
Share

नाशिक : राज्यात एकीकडे नागपूर येथील अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सुरू असलेल्या कार्यक्रमानंतर लोकसभेच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले आहे. मात्र दुसरीकडे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये आहे. मालेगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमाला ते भेट देणार असून नाशिकमध्ये त्यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं टाळत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, चार भीतीच्या आत बसलो, घरात बसल तर लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेव्हल वर काम करावं लागतं, लोकांमध्ये मिसळाव लागतं, कार्कर्त्यांना जपावं लागत असा टोला लगावला आहे.

दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत असतांना आतापर्यंत अनेक सत्तांतर झाली पण हे सत्तांतर ऐतिहासिक, 50 आमदार आणि 13 खासदार निघून गेले याबाबत आत्मपरीक्षण करायला हवं, लोकं का चाललेत याचा विचार केला पाहिजे.

काय चुकतंय हे तपासायला हवं, हे डबल इंजिन सरकारचं आहे, चांगलं काम करत आहे, राज्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा केंद्राची मदत लागेल, तेव्हा केंद्राकडून मदत घेण्याचं काम मोठ्या मनाने हे सरकार करेल असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

तुम्ही अडीच वर्षे घरी बसून काम केलं, राज्याला मागे नेलं असा टोला देखील शिंदे यांनी लगावला यावेळी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देखील शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सूनावलं आहे.

विरोधकांकडे काही प्रश्नच उरले नाहीत, सरकार आल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत चाललाय.

विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्यानं काहीतरी मुद्दे काढायचे, अभ्यास करायचा नाही, फक्त बेछूट आरोप करत सुटायचे इतकचं त्यांचं काम सुरू असून आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नाहीये असेही शिंदे यांनी म्हंटलं आहे.

आज अधिवेशनात बोलणारे अडीच तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील असा टोला लगावत सीमावादावर सरकार गंभीर आहे असे शिंदे यांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत यांच्या बरोबर लोक होते, तेव्हा चांगले होते आणि आता सोडून गेल्यानंतर त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न, तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही, तुम्ही रोज मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करत आहे.

तुमची सकाळ खराब आहे, पण लोकांची पण सकाळ खराब करतायत, लोकांना हे चालणार नाही, लोकांना विकास हवा, तो विकास आमचं सरकार करतय असे म्हणत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे यांना टार्गेट कुणाला केलं जातं नाही, कुणावर आरोप झाले असतील त्यांचं स्पष्टीकरण झालं पाहिजे, लोकांना सत्य कळलं पाहिजे असे आदित्य ठाकरे यांच्यावर बोलतांना म्हंटलं आहे.

Follow Us
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण