AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी मुलांना विहिरीत ढकललंय… फोन येताच काळजात धस्स झालं; सोलापुराच्या शेतात नेमकं काय घडलं?

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात जुळ्या मुलांची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पित्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मी मुलांना विहिरीत ढकललंय... फोन येताच काळजात धस्स झालं; सोलापुराच्या शेतात नेमकं काय घडलं?
फोटो प्रातनिधिक
| Updated on: Jan 11, 2026 | 2:02 PM
Share

रागाच्या भरात माणूस काय करेल याचा नेम नाही, याचाच प्रत्यय देणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केत्तूर येथे घडली आहे. करमाळ्यात घरातील किरकोळ वादातून एका पित्याने आपल्या ७ वर्षांच्या जुळ्या मुलांचा विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवांश सुहास जाधव आणि श्रेया सुहास जाधव अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या कृत्यानंतर आरोपी पित्यानेही विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपी सुहास ज्ञानदेव जाधव (३२) हा वीज वितरण कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून सुहास प्रचंड रागात होता. याच रागाच्या भरात त्याने आपली मुले शिवांश आणि श्रेया यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने हिंगणी येथील स्वतःच्या शेतात नेले. तिथे विहिरीवर नेऊन काही कळण्याच्या आत त्याने या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले.

मुलांना पाण्यात ढकलल्यानंतर सुहास तिथून निघून गेला नाही, तर काही वेळ तिथेच थांबला. काही वेळाने त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. यानंतर त्याने स्वतःच घरी फोन लावला. मी मुलांना विहिरीत ढकलून दिले आहे, असे त्याने घरच्यांना सांगितले. हे ऐकून कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा करत विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत उतरून मुलांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण तोपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. सात वर्षांच्या या भावंडांचा असा करुण अंत पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.

मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी सुहास जाधव यानेही स्वतःचे आयुष्य संपवण्यासाठी शेतातच विषारी औषध प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुहासला ताब्यात घेतले असून त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

पोलिसांचा सखोल तपास सुरु

पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सुहास जाधव याने इतके टोकाचे पाऊल का उचलले? केवळ घरातील वादच कारण होते की अजून काही? याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. एका सुशिक्षित पित्याने आपल्याच पोटच्या गोळ्यांचा असा अंत केल्याने समाजातून संताप व्यक्त होत आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत