AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 मिनिटांत नुकसानीची किती पाहणी करणार ?, अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

मला तर आश्चर्य वाटतंय अर्ध्या तासात किती शेतावर गेले असतील? काय ओला दुष्काळ कळला असेल?

24 मिनिटांत नुकसानीची किती पाहणी करणार ?, अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Oct 23, 2022 | 5:31 PM
Share

सोलापूर : शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला. आमच्यामुळे विरोक्षी पक्ष रस्त्यावर उतरू लागेल, असा पलटवार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. यापूर्वी रस्त्यावर कितीवेळा उतरले हे देखील पाहिलं, असंही सत्तार यांनी म्हंटलंय. शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारेल. कारण सनदशीर मार्गानं आम्ही पाहणी करतो. मागण्या सरकारपुढं ठेवतोय, असं दानवे यांचं म्हणणंय.

यावर अब्दुल सत्तार म्हणाले, जरूर उतरा. कारण रस्त्यावर उतरण्याचीच पाळी आली. रस्त्यावर यायला पाहिजे. गरीब, शेतकरी, शेतमजुराला मदत करायला पाहिजे.ती नाही केली म्हणून तर ही वेळ आली. त्यांच्याकडं जी काही फौज होती 55 आमदारांची. या 55 पैकी 15 आमदार राहिले. 40 आमदार गेले. याचंही कुठंतरी चिंतन, मंथन करायला पाहिजे. आधी मंत्र्यांना, आमदारांना भेटायला वेळ नव्हता. आता ही परिस्थिती निर्माण झाली.

अब्दुल सत्तार म्हणाले, मला तर आश्चर्य वाटतंय अर्ध्या तासात किती शेतावर गेले असतील? काय ओला दुष्काळ कळला असेल? शेतकऱ्यांशी काय चर्चा केली माहीत नाही. जून, जुलै, ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये मदत दिली. आताही ज्यांची नुकसान झाले त्यांनाही मत देण्यासाठी युद्धपातीवर काम करतोय.

आम्हाला गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यांची दिवाळी चांगली करायचे आहे. त्यांना मात्र फक्त राजकारण करायचे. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांशी किती वफादारी केली. आम्ही शेतकऱ्यांशी कसे वागलो. याचा तुलनात्मक अभ्यास करावा, असा सल्लाही सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

मी 45 दिवसांपासून पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. मात्र यांनी अर्धा तासात काय पाहिलं असेल. त्यांना दुष्काळ काय कळाला असेल? ते फक्त राजकारण करण्यासाठी आलेले आहेत, अशी टीकाही सत्तार यांनी ठाकरे यांच्यावर केली. सत्तेत असताना त्यांनी वेळ दिला असता तर आज ही वेळ आली नसती, असंही ते म्हणाले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान