AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटकचा डल्ला”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं कर्नाटकची चोरी उघड केली

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुर आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्नाटकवर टीका केल्याने कर्नाटक सरकार आता काय निर्णय घेतं त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटकचा डल्ला; राष्ट्रवादीच्या नेत्यानं कर्नाटकची चोरी उघड केली
| Edited By: | Updated on: Mar 23, 2023 | 11:40 PM
Share

सोलापूर : काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका मंत्र्याने सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला होता. तर आता आणखी नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या औज बंधाऱ्यातून कर्नाटक सरकार पाणी चोरत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केल्याने सीमाभागातील राजकारण आता तापले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कर्नाटक हद्दीतील इंडी तालुक्यातील मरगूर या गावाजवळ 570 हॉर्स पॉवर क्षमतेच्या पंप हाऊसद्वारे हाऊस बंधाऱ्यातून पाणी उपसा करण्यात येत आहे.

सोलापूर महापालिका या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये जलसंपदा विभागाला भरत असते मात्र कर्नाटक सरकार बिनधास्तपणे पाणी उपसा करून नागरिकांना पुरवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

कर्नाटकच्या या पाणी चोरीमुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत उपाययोजना करून सोलापूरकरांना पाणी दिले पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

दरम्यान या आरोपानंतर महापालिका प्रशासन तसेच राज्य शासन तोडगा काढते की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारची चोरी उघडपणे सांगितल्यामुळे आता सीमावाद चिघळणार की कर्नाटक सरकार त्यावर प्रत्युत्तर देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला जात आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुर आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्नाटकवर टीका केल्याने कर्नाटक सरकार आता काय निर्णय घेतं त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.