AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण एकच लक्ष’ धनगर समाजाचा पुन्हा एल्गार; आमरण उपोषण केलं जाणार

Solapur Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. धनगर समाजाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सोलापुरातून आमरण उपोषणाचा नारा देण्यात आला आहे. कधीपासून सुरु होणार आहे हे आंदोलन? उपोषणासंदर्भातली महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर बातमी...

'ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण एकच लक्ष' धनगर समाजाचा पुन्हा एल्गार; आमरण उपोषण केलं जाणार
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 31, 2024 | 11:05 AM
Share

मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अनेकदा उपोषण केलं जातं. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं. असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करणार आहेत. येत्या 9 सप्टेंबरपासून हे उपोषण सुरु होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी या आंदोलनाची रूपरेषा सांगितली.

कधी केलं जाणार आमरण उपोषण?

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे. सकल धनगर समाज संघटनेच्या वतीने या आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरु होणार आहे. पंढरपूरमध्ये आमरण उपोषण केलं जाणार आहे. ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’ असा नारा देत या आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. जेजुरीतील खंडेरायाचं दर्शन घेत या उपोषणाची सुरुवात होणार आहे.

आंदोलक अमोल कारंडे यांनी काय म्हटलं?

सकल धनगर जमातीच्यावतीने 9 सप्टेंबरपासून पंढरपूरमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहे. सकल धनगर समाज या बॅनरखाली ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’ असा नारा देत सामुहिक नेतृत्वात हे उपोषण करणार आहे. 1 सप्टेंबर रोजी जेजुरी येथून मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरीत भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने धनगर बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे, असं सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील सहाही पक्षांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते, नेते आमरण उपोषण करणार आहोत, असं सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.