AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली

अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली
| Updated on: Mar 18, 2023 | 5:05 PM
Share

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभा पिकांवर शेतकऱ्यांना नांगर फिरवावा लागला होता. तर आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर, माळशिरस तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसाना झाले आहे.

सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू आहे, तर दुसरीकडे निर्यातीवर कर लावल्यामुळे द्राक्षांच्या दरावर मोठी परिणाम झाला आहे. त्यामुळे विक्रीसाठी असलेल्या द्राक्षांमुळेही शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असतानाच आता आणि निसर्गाने अवकाळी पावसाचा दणका दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब,सरगरवाडी या गावात गारासह जोरदार पाऊस झाला आहे.

त्यामुळे शेतातील पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, मका आणि ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली आहे. गहू, ज्वारी आणि द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार का असा सवाल आता शेतकरी करून लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब, सरगरवाडी भागाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

या भागात झालेल्या पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.