AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली

अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 18, 2023 | 5:05 PM
Share

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभा पिकांवर शेतकऱ्यांना नांगर फिरवावा लागला होता. तर आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर, माळशिरस तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसाना झाले आहे.

सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू आहे, तर दुसरीकडे निर्यातीवर कर लावल्यामुळे द्राक्षांच्या दरावर मोठी परिणाम झाला आहे. त्यामुळे विक्रीसाठी असलेल्या द्राक्षांमुळेही शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असतानाच आता आणि निसर्गाने अवकाळी पावसाचा दणका दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब,सरगरवाडी या गावात गारासह जोरदार पाऊस झाला आहे.

त्यामुळे शेतातील पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, मका आणि ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली आहे. गहू, ज्वारी आणि द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार का असा सवाल आता शेतकरी करून लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब, सरगरवाडी भागाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

या भागात झालेल्या पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

Follow Us
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या